Leader
शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुक अंतिम टप्यात आली असुन शिरुर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये स्क्रॅप, लेबरची, ट्रान्सपोर्टची कामे देऊ अशी आमिषे दाखवुन सध्या मलिदा गॅंग तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करत आहेत. त्यांच्या या आमिषाला बळी पडून काही तरुणवर्ग या मलिदा गॅंग मध्ये सहभागी झाले आहेत. मात्र केवळ निवडणुकीपर्यंत हि मलिदा गॅंग या तरुणांना केवळ बळीचा बकरा करणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे तरुणांना या गॅंग पासुन सावध राहावे लागणार आहे.
यासाठी मागील जिल्हा परिषद निवडणुकीचा एक अनुभव पुरेसा आहे. शिरुर ग्रामीण-न्हावरे या जिल्हा परिषद गटाची मागील टर्मची पंचवार्षिक निवडणुक पार पडली. करडे व तर्डोबाची वाडी येथील दोन उमेदवारांत हि निवडणुक चांगलीच रंगली होती. आमदार पुत्र उमेदवार असल्याने व त्यांना सर्वसामान्य जनतेची सहानुभूती असल्याने ते ही निवडणूक सहज जिंकतील असा आशावाद जाणकारांना होता. मात्र याच वेळी ही ‘मलिदा गॅंग’ सक्रीय झाली.
त्यांच्या दिमतीला फॉरच्युनर, ऑडी, इन्होवा, अशा चकचकीत गाड्या. त्या चकीचकीत गाड्यांमध्ये असणारे व उच्चभ्रू राहणीमान ठेवणारे दादा, आप्पा, भाऊ असे ‘मलिदा सम्राट’ या गॅंगची तालुक्यातील बेरोजगार तरुणांना भुरळ पडली. आम्ही तुम्हाला निवडणुकीनंतर औद्योगिक वसाहती मध्ये काम देऊ, ठेकेदारी देऊ अशी आमिषे दाखवत त्यांनी तरुण वर्गाला प्रचाराला जुंपवले.
संपुर्ण जिल्हा परिषद गटात हीच अमिषे ही गॅंग दाखवत गेली आणि झाडुन सारा तरुण वर्ग या गॅंगच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. शेवटच्या दोन दिवसात वातावरण फिरले आणि जनतेची सहानुभूती असलेला उमेदवार पराभूत झाला आणि मलिदा गॅंग मधील उमेदवार विजयी झाला. तरुणांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात विजय उत्सव साजरा झाला आणि गावोगावी जंगी स्वागत केले.
त्यानंतर निवडणुक संपली, उमेदवार विजयी झाला. नव्याचे नऊ दिवस संपले. दादा, भाई, आप्पा, भाऊ आज ना उद्या ठेकेदारी देण्यासाठी फोन करतील अशी आशा या तरुणांना होती. मात्र तसे काही घडले नाही. मग या तरुणांनी भाऊ, दादा, आप्पा यांना फोन लावायला सुरुवात केली. मात्र या तरुणांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी वाजणारा फोन ही सतत बिझी यायला लागला. या तरुणांचे फोन ब्लॅक लिस्ट मध्ये गेले, ब्लॉक झाले.
त्यानंतर या तरुणांना ना.. काम मिळाले… ना ठेकेदारी मिळाली, ना कामाचा मोबदला मिळाला. तेलही गेले तुपही गेले, हाती धुपाटणे आले अशीच अवस्था या तरुणांची झाली. पाच सहा वर्षांपूर्वीचा हा अनुभव गाठीशी असताना पुन्हा या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ही मलिदा गॅंग बेरोजगार तरुणांचे ब्रेन वॉश करुन, त्यांना अमिषे दाखवून सक्रिय झाली आहे. म्हणूनच आत्ताच्या या निवडणुकीत तरुणांनी या मलिदा सम्राटांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे.
शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…
Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…
Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार
Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार
शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…