Talegaon-Ambulance
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य केंद्रांना दिलेल्या रुग्णवाहिकेचा वापर रुग्ण नव्हे, तर बिर्याणीच्या पातेल्यांच्या वाहतुकीसाठी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोग्य सेवेच्या जबाबदारीची अशी पायमल्ली होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अलीकडेच एका कार्यक्रमासाठी बिर्याणी ने-आण करत असल्याचे दृश्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. रुग्णांना तातडीने दवाखान्यात पोहोचवण्यासाठी सज्ज असणारी ही रुग्णवाहिका वैद्यकीय उपयोगाऐवजी खासगी कामांसाठी वापरली जात असल्याने आरोग्य यंत्रणेच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा असा गैरवापर होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेला कोण जबाबदार?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
या घटनेमुळे स्थानिक आरोग्य प्रशासनावरही टीकेची झोड उठली जात आहे. संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू करून, दोषींवर अनुशासनात्मक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
आरोग्य सेवेसाठी महत्त्वाची असलेली रुग्णवाहिका जर बिर्याणी वाहतूक करण्याचे साधन ठरत असेल, तर अशा घटनांनी “सेवा”चे रूपांतर “स्वार्थात” झाल्याचे स्पष्ट होते, अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. आता दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…
शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…
Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…