Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह (ता.शिरूर जि. पुणे) येथील कुणाल गोडसे यांच्यासोबत शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळच्या सुमारास आदीत्य पानमंद व ज्ञानेश्वर रोकडे यांचा किरकोळ वाद झाला. या किरकोळ वादाचा राग मनात धरून पानंमद आणि रोकडे यांनी गोडसे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी कुणालची आई रेश्मा गोडसे या भांडण सोडविण्यासाठी आल्या व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना व त्यांच्या सुनेला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी आदित्य पानंमद याने त्यांच्या हाताला चावा घेऊन दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. रेश्मा गोडसे (रा. चांडोह ता. शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत.
संतापजनक! तळेगाव ढमढेरे आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका वाहते चक्क बिर्याणीचे पातेले…
शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…
शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…