{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन मुलींनी नेमबाजी प्रकारात कौतुकास्पद मिळवलं आहे. शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या समृद्धी अजय चव्हाण तसेच श्रावणी संतोष वाळके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवत शिरुरचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे.
या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात समृद्धी अजय चव्हाण (विद्याधाम प्रशाला, शिरुर) हिने १४ वर्षे वयोगटात (४१०.२) गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावले. तर श्रावणी संतोष वाळके (कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कारेगाव) हिने १९ वर्षे वयोगटात (४१४.७) गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळवले.
या दोन्ही दोन्ही नेमबाज विद्यार्थिनींची भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असुन, त्यांच्या या कामगिरीमुळे शिरुरचा मान उंचावला आहे. या दोन्ही नेमबाज विद्यार्थिनी छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेअंतर्गत युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, शिरूर येथे प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे यांनी समृद्धी व श्रावणीचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’
शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…
मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…
सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…
हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…
कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…
1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…