{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन मुलींनी नेमबाजी प्रकारात कौतुकास्पद मिळवलं आहे. शिरुरच्या युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लबच्या समृद्धी अजय चव्हाण तसेच श्रावणी संतोष वाळके यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक मिळवत शिरुरचा झेंडा राज्यस्तरावर फडकावला आहे.
या स्पर्धेत १० मीटर पिप साईट एअर रायफल या प्रकारात समृद्धी अजय चव्हाण (विद्याधाम प्रशाला, शिरुर) हिने १४ वर्षे वयोगटात (४१०.२) गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावले. तर श्रावणी संतोष वाळके (कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल, कारेगाव) हिने १९ वर्षे वयोगटात (४१४.७) गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळवले.
या दोन्ही दोन्ही नेमबाज विद्यार्थिनींची भोपाळ (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ साठी निवड झाली असुन, त्यांच्या या कामगिरीमुळे शिरुरचा मान उंचावला आहे. या दोन्ही नेमबाज विद्यार्थिनी छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेअंतर्गत युनिक शूटिंग स्पोर्ट्स क्लब, शिरूर येथे प्रशिक्षक शरद तरटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे, उपाध्यक्ष धनंजय थिटे यांनी समृद्धी व श्रावणीचे अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…