Mahaganpati
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
रांजणगाव गणपती: रांजणगाव येथे असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महागपणतीच्या दर्शनासाठी येथे दररोज राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना मंदिर परिसरात भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महागणपती मंदिराच्या आवारात एका पाणपोई आहे. भाविकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनानंतर पाणपोई सध्या बंद आहे. त्यामुळे दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उन्हामुळे तापमान वाढले असताना मंदिर परिसरात थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु, पाणपोई सुरू असूनही त्यात पाणी नाही. काही भाविकांनी सांगितले की, मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी आणि सप्ताहांताला भाविकांची संख्या अधिक असते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्यास भाविकांना त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही मंदिराच्या विकासकामांबाबत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदिर परिसरातील विकासकामांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची आवश्यकता असून मंदिर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
भाविकांसाठी सुरू केलेली पाणपोई प्रत्यक्षात कार्यान्वित करून नियमित पाण्याची व्यवस्था करावी, तसेच मंदिर परिसरातील विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओंकार देव यांनी सांगितले की, ‘पाणपोई कार्यन्वीत असून, एखाद्या वेळेस बंद राहिली असेल तर चालू करण्यास सांगितले जाईल.’ दरम्यान, स्थानिक नागरिकाने पाणपोई बंद असल्याचे सांगितले.
Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन
रांजणगावमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी…
रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपती च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण
मुंबई: नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत…
मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची…
नवी दिल्ली: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या कथित…
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जाहीर दिलगिरी व्यक्त करत…
शिरुर (तेजस फडके) शिंदोडी गावात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू फिरत असल्याचे…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप…