trupti-sarode
शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्ती सरोदे यांना गटात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिंदोडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महिला भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तृप्ती सरोदे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून त्या आपल्या जिल्हा परिषद गटातील १७ गावांमध्ये व वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष भेटी देत आहेत. या दौऱ्यादरम्यान महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांकडून शुभेच्छा आणि पाठिंबा मिळत आहे.
या वेळी त्यांनी गटातील प्रमुख समस्यांवर भाष्य केले. या झेडपी गटात रोजगाराचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, बिबट्यांचा वाढता त्रास, रस्त्यांची दुरवस्था, महिलांच्या आरोग्याच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित अडचणी आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडाही जाणवत आहे. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे,” असे तृप्ती सरोदे यांनी सांगितले.
क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या या संवादातून ग्रामीण भागातील विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती सरोदे यांच्या संपर्क मोहिमेला वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर
मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व…
कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी…
बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला…
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास…
कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि…
उत्पादन घट, आयात आणि साठेबाजीच्या आरोपांनी सरकारसमोर प्रश्न मुंबई : देशातील साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या…