मुख्य बातम्या

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! रोडरोमिओंना लगाम घालण्यासाठी दामिनी पथक सुरु करा; आयेशा सय्यद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले.

शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ भागात वाढलेल्या गर्दीमुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रोडरोमिओंचा वावर, छेडछाड आणि गैरवर्तनाच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महिला सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील संवेदनशील व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र ‘दामिनी पथक’ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महिलांवरील अत्याचार, छेडछाड व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील पालक, नागरिक आणि विद्यार्थिनींकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरात लवकर दामिनी पथक कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी आश्रमशाळांच्या प्रश्नांसाठी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार; आमदार सत्यजीत तांबे

शिरपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नसून अनुदानित आदिवासी आश्रमशाळांसमोरील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा…

8 तास ago

NEP-2020 अंमलबजावणीला गती; राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र…

8 तास ago

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा महायुतीवर निशाणा

मुंबई: राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर…

8 तास ago

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…

8 तास ago

महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच राज्यात अवैध धंदे, ड्रग्ज, विषारी दारुचे थैमान; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात…

8 तास ago

नियमांना हरताळ? दावडी निमगावात कंपनीचे काळे प्लास्टिक जाळल्याचा गंभीर प्रकार

नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणाला धोका दावडी निमगाव (अक्षय टेमगिरे): खेड तालुक्यातील दावडी निमगाव हद्दीतील लोणकरवाडी परिसरात…

8 तास ago