शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ‘दामिनी पथक’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलीम सय्यद यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांना देण्यात आले.
शहरातील शाळा व महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींची दैनंदिन ये-जा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शाळा-महाविद्यालय परिसर, बसस्थानके, मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ भागात वाढलेल्या गर्दीमुळे महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही ठिकाणी रोडरोमिओंचा वावर, छेडछाड आणि गैरवर्तनाच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महिला सुरक्षेला प्राधान्य देत शहरातील संवेदनशील व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र ‘दामिनी पथक’ नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पथक शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानके, बाजारपेठ आणि प्रमुख चौकांमध्ये नियमित गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महिलांवरील अत्याचार, छेडछाड व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील पालक, नागरिक आणि विद्यार्थिनींकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरात लवकर दामिनी पथक कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…