मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी महत्वाचं देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी स्वाती दत्तात्रय पाचुंदकर यांची बिनविरोध निवड झाली असुन रांजणगाव गणपती देवस्थानच्या इतिहासात सन 1941 नंतर प्रथमच स्वाती पाचुंदकर यांची महिला अध्यक्ष म्हणुन पहिल्यांदाच निवड झाली असुन देवस्थानच्या इतर चार सहकाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी स्वाती पाचुंदकर यांनाच बिनविरोध अध्यक्ष म्हणुन नियुक्त केले असल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पुणे येथील दिवाणी न्यायालयाने या निवडप्रकियेचा कार्यक्रम मुलाखतीनंतर जाहीर केला. पाच वर्षे कार्यकाळ असलेल्या या ट्रस्टींच्या 5 जागेकरिता सुमारे ३६७ पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यामधून नूतन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली. या पाच विश्वस्तांमध्ये देव घराण्यातील दोन विश्वस्त म्हणून ओमकार नितीन देव व विजय काशिनाथ देव तर स्थानिक ग्रामस्थ मधून तुषार बाळासाहेब पाचुंदकर आणि स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि पुणे जिल्ह्यातील एक विश्वस्त म्हणून कन्हेरसर (ता. खेड) येथील रहिवासी संदीप तुकाराम दौंडकर यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली होती.

12 जानेवारी रोजी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पाच विश्वस्तांची निवड झाल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी गुरुवार (दि 19 )विश्वस्त मंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत मुख्य विश्वस्तपदी ओंकार नितीन देव यांची तर अध्यक्षपदी स्वाती पाचुंदकर यांची पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी संदीप दौंडकर, सचिवपदी तुषार पाचुंदकर आणि खजिनदारपदी विजय देव यांची निवड करण्यात आली. या सर्वच निवडी बिनविरोध पार पडल्या. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष, मुख्य विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महागणपती मंदिरात आरती करण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

आजोबांनंतर नातू तरुणपणीच मुख्य विश्वस्त… 

या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये ओंकार नितीन देव यांना तरुणपणीचं वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षीचं मुख्य विश्वस्त म्हणुन श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट मध्ये संधी मिळाली असुन ओंकार यांचे आजोबा वसंतराव मोरेश्वर देव हे सुद्धा रांजणगाव देवस्थान मध्ये मुख्य विश्वस्त होते. त्यांच्या नंतर चाळीस वर्षांनी ओंकार यांची देवस्थान मध्ये निवड झाली आहे.

रांजणगावच्या सरपंच ते देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा…

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या स्वाती पाचुंदकर या रांजणगाव गणपती गावच्या आदर्श सरपंच, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असुन रांजणगाव – कारेगाव जिल्हा परिषद गटात त्यांनी महिलांचे मोठे संघटन केले आहे. त्यांना अध्यक्षपदी संधी मिळाल्यानंतर महिलांनीही मोठया प्रमाणात जल्लोष केला आहे.

रांजणगाव गणपती हे अष्टविनायकापैकी एक महत्वाचे देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या पुढील काळात भाविकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सामाजिक दायित्व म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, या तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याला आमचे प्राधान्य राहिल. असे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या नवनियुक्त अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

9 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

12 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

12 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

12 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

14 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

14 तास ago