मुख्य बातम्या

शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक बऱ्याच दिवसापासून त्यांची कामे मार्गी न लागल्याने प्रमाणात त्रस्त झाले असुन याबाबत राजकीय अनास्था कारणीभूत असल्याची चर्चा तालुक्यात होत असताना आमदार अशोक पवार यांनी 30 जानेवारी पर्यंत पुर्ण वेळ तहसिलदारांची नियुक्ती न झाल्यास आमरण उपोषण करणार आहेत. गेल्या वर्षभर सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत असताना आमदार वर्षभर करत होते याचा प्रश्न शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

गेल्या वर्षभराहून अधिक काळ, शिरूर तालुक्याचा कारभार प्रभारी तहसिलदारांमार्फत चालविला जात असताना आणि याबाबत आता सर्वपक्षीय पातळीवर निवेदन देणे सुरू झाले असतानाच आमदार ॲड. अशोक पवार यांनी या विषयात उडी घेत, शिरूर तालुक्यासाठी येत्या 30 जानेवारीपूर्वी पूर्ण वेळ तहसिलदारपद भरले न गेल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मात्र आमदार पवार यांनी याबाबत निर्णय का घेतला नाही हे सर्वसामान्य लोकांना पडलेलं कोडंच आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर, प्रशासकीय घडी विस्कटली असून, या प्रशासकीय गलथान व्यवस्थेस शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला आहे. शिरुर तालुक्यात प्रभारी तहसिलदारामार्फत कारभार चालविला जात असल्याने गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे रखडली आहेत. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन कामासाठी तहसिल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सामान्य माणसाच्या दैनंदिन कामकाजातही मोठी अडवणूक होत आहे. गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, उद्योजक व व्यावसायिकवर्ग शासकीय दाखले व इतर कागदपत्रांसाठी तहसिलदार कार्यालयात येतो. पण येथे आल्यावर एकतर तहसिलदार नाही किंवा असले तरी प्रभारी असल्याने धोरणात्मक कामकाजांकडे ते कानाडोळा करतात, अशा असंख्य तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या असल्याचे आमदारांनी सांगितले.

तीन ते चार लाख लोकसंख्येच्या आणि कृषी व औद्योगिक क्षेत्रात लौकीक असलेल्या शिरूर तालुक्यावर हा अन्याय करण्यामागे नेमके काय गुपित आहे. राज्यस्तरीय सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक शिरुरवर अन्याय केला जातो आहे का, असा सवाल करत तहसिलदार या प्रशासकीय प्रमुखाअभावी तालुक्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असताना आणि याबाबत शासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आपण 30 जानेवारीपर्यंत वाट पाहणार. त्या कालावधीत कायमस्वरूपी, पूर्ण वेळ तहसिलदारपद न भरल्यास तहसिलदार कार्यालयापूढे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

8 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

8 तास ago

महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी; फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

मुंबई: भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.…

8 तास ago

घोडगंगा कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

शिरूर : शिरूर तालुक्यातील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर हालचालींना…

8 तास ago

रूसा, पीएम उषा प्रकल्पांना गती द्या; विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात; चंद्रकांत पाटील

मुंबई : विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध विकासकामे…

10 तास ago