मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रस्त्यावर बुधवार (दि 13) रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या तरुण महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुजा विनय शिळीमकर (वय २९, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, या घटनेने न्हावरे, मांडवगण फराटा गावासह संपुर्ण परिसर हळहळला आहे. याप्रकरणी न्हावरे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

न्हावरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिळीमकर या न्हावरे येथील एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणुन कार्यरत होत्या. बुधवारी (ता.१३) रोजी नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम पुर्ण करुन त्या सायंकाळी आपल्या दुचाकीवरुन मांडवगण फराटा येथील घरी परतत होत्या. मात्र, घर अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

सायंकाळी 7:30 च्या सुमारास न्हावरे-निर्वी रस्त्यावर निर्वी गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा गंभीर होता की, ऋतुजा यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋतुजा यांना नागरिकांनी तत्काळ न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.

या प्रकरणी मयत ऋतुजा यांच्या चुलते राजेंद्र बहिरट यांनी न्हावरे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कसा झाला, अन्य वाहनाचा धक्का होता का, की रस्त्याच्या अवस्थेमुळे दुर्घटना घडली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ऋतुजा शिळीमकर यांचे माहेर न्हावरे गावातच असून, त्यांचे वडील अनिल उर्फ बंडू बहिरट हे परिसरातील परिचित व्यावसायिक आहेत. ऋतुजा या स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळावू आणि जबाबदार होत्या. बँकेतही त्यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्राहकांमध्येही शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, न्हावरे-निर्वी रस्ता पुन्हा एकदा या अपघातामुळे चर्चेत आला असून, या मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. धोकादायक वळणे, अपुरी प्रकाशयोजना, भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि रस्त्यावरील सुरक्षेचा अभाव यामुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यापुर्वीही या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात झाले असून, प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतीच भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिरुर; चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीस ३८ लाखांचा दंड, सहा महिन्यांची शिक्षा

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिरुर; कारभारणीच्या नथीतुन;कारभारीच मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या पतींचा वाढतोय हस्तक्षेप…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीस ३८ लाखांचा दंड, सहा महिन्यांची शिक्षा

शिरुर (तेजस फडके) घोडनदी (शिरुर) येथील न्यायालयाने तब्बल १३ वर्षे चाललेल्या चेक अनादर (Cheque Bounce)…

3 तास ago

पुणे जिल्ह्यात अजब चोरी! मेडिकल फोडून चोरले फक्त कंडोम अन्…

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकणमधील खराबवाडी परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये झालेल्या चोरीची परिसरात जोरदार चर्चा सुरू…

4 तास ago

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा

मुंबई: राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची…

17 तास ago

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; ईव्ही गाडीचा वापर सुरू, परदेश दौऱ्यांनाही कात्री

ठाणे: देशासमोर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा,…

17 तास ago

रायगड पर्यटन विकासाला गती; प्रलंबित कामांसाठी निधी देणार; शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांना गती देत आवश्यक निधी…

18 तास ago

पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई

मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून,…

18 तास ago