मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील करडे येथे तलाठ्याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पवन अशोक बांदल (वय ३२) यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन बांदल हे मंगळवारी सकाळी घरून नेहमीप्रमाणे पाबळ येथे कामावर जात असल्याचे सांगून निघाले होते. त्यावेळी त्यांनी सोबत दप्तर आणि जेवणाचा डबा घेतला होता. निघताना त्यांच्या भावाने, श्रीनिवास बांदल यांनी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यास सांगितले होते.

सुमारे १२.४५ च्या सुमारास श्रीनिवास बांदल विहिरीकडे गेले असता, त्यांना तिथे पवन यांची गाडी आणि बॅग दिसली. त्यांनी विहिरीत पाहिल्यावर पाण्यात पवन यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना व पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील रुग्णालयात पाठवला.पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोथे करीत आहेत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

4 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

4 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

4 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

7 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

8 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

8 तास ago