मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत यांनी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय पाठिंबा दिला होता. पुणे येथील सहायक कामगार आयुक्त एम ए मुजावर यांनी कामागारांच्या मागण्या, अटी मान्य केल्याने हे उपोषण थांबविण्यात आले आहे.

शनिवार (दि 10) पासुन सोमनाथ भगत यांनी शिरुर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. सोमनाथ भगत कंपनीचे इतर कर्मचारी हे भारत एकता मिशन यांच्या भीम आर्मीचे सदस्य असल्याने भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, शिरुर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरुर तालुकाध्यक्ष अजित नरवडे, शिरुर तालुका महिलाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला होता.

शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी या आंदोलकांची भेट घेत कामगार आयुक्त यांच्याशी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, मानव विकास परीषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख अनिल पवार आदी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही उपोषण करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.

त्याच अनुषंगाने सोमनाथ भगत यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेत सहायक कामगार आयुक्त एम ए मुजावर यांनी कामागारांच्या मागण्या व अटी मान्य केल्या असल्याने आज हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरूर तालुकाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी, मानव विकास परीषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

9 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

9 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

9 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

14 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

14 तास ago