संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणारं उदाहरण
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शक्ती प्रिंटर्सचे मालक, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी आपल्या जीवनप्रवासात एक नवा अध्याय जोडला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकीली)ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत त्यांनी “वय म्हणजे केवळ एक आकडा असतो” हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशामुळे शिरूर परिसरात आणि तालुकाभरातून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबुरावकाकांचा जीवनप्रवास हा संघर्षांनी भरलेला असला तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य सांभाळून त्यांनी शिक्षणाची धग मनात जागवली आणि चिकाटीने एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं, तर “शिकण्याला वयाचं बंधन नसतं. प्रयत्नात सातत्य असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”
विशेष म्हणजे, बाबुरावकाकांचा ६१ वा वाढदिवस साजरा होत असतानाच एल.एल.बी.चा निकाल जाहीर झाला आणि त्यात त्यांनी उत्तम यश संपादन केलं. त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात दुहेरी आनंदाचा ठरला.
वाढदिवसाचा उत्सव आणि वकिलीच्या यशाची गोड बातमी
या यशानंतर प्रतिक्रिया देताना बाबुरावकाकांनी स्पष्टपणे सांगितलं –”मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून समाजातील गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी विनामूल्य सेवा देणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदतीसाठी मी नेहमी उपलब्ध राहणार आहे.”
बाबुरावकाका हे सामाजिक जाणिवा असलेले, नम्र, स्पष्टवक्ते आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांचं स्थान तालुक्यात विशेष आहे. आता त्यांचं नाव फक्त “बाबुरावकाका पाचंगे” न राहता, “ॲड. बाबुरावकाका पाचंगे” म्हणून ओळखलं जाईल, याचा संपूर्ण शिरूर तालुक्याला अभिमान आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…