मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले.
रोहित शर्माला या लीगचा मुख्य चेहरा बनवण्यात आला असून या वर्षीच्या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर यांसारखे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम येथे हे सामने आयोजित केले आहे. एकूण ८ संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत. लीगसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, क्रिकेटप्रेमींना यंदा एक रोमांचक आणि दर्जेदार क्रिकेट सामन्यांचा अनुभव मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई टी२० लीगने स्थानिक पातळीवर असलेल्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आणले आहे. अनेक तरुणांनी या लीगमधून प्रेरणा घेत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या भव्य क्रिकेट महोत्सवाची प्रतीक्षा आता सर्वत्र सुरू झाली असून, आजपासून मुंबईत क्रिकेटचे खरे पर्व सुरू होणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…