मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले.
रोहित शर्माला या लीगचा मुख्य चेहरा बनवण्यात आला असून या वर्षीच्या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर यांसारखे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम येथे हे सामने आयोजित केले आहे. एकूण ८ संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत. लीगसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, क्रिकेटप्रेमींना यंदा एक रोमांचक आणि दर्जेदार क्रिकेट सामन्यांचा अनुभव मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई टी२० लीगने स्थानिक पातळीवर असलेल्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आणले आहे. अनेक तरुणांनी या लीगमधून प्रेरणा घेत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या भव्य क्रिकेट महोत्सवाची प्रतीक्षा आता सर्वत्र सुरू झाली असून, आजपासून मुंबईत क्रिकेटचे खरे पर्व सुरू होणार आहे.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…