शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील प्रीतम प्रकाश नगर येथे शिवम मधील हॉटेल कामगाराला दुचाकीहून सोडण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवून हॉटेल समोर जाऊन हॉटेल मॅनेजरला कोयता दाखवून मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवणाऱ्या तिघांना शिरुर पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडील कोयता जप्त केला आहे.शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड (तिघे रा. प्रितम प्रकाश नगर, शिरूर) यांना अटक केली आहे. याबाबत सुरेश शंकराव भांगे (वय ६१)रा. गुरुकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर यांनी शिरुर पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे (दि. १८) फेब्रुवारी रोजी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान शिरुर शहरातील पाबळ फाटा येथून शिवम हॉटेलचा कामगार हकिक खान हा दुचाकीहून जात असताना प्रदीप गायकवाड याने त्याला अडवून प्रीतमनगर येथे सोडण्यासाठी दमदाटी केली. तेथे आणून सोडल्यानंतर हकिक हा घाबरून शिवम हॉटेलकडे गेला. त्यानंतर शहीद शेख, सोनू उर्फ अशपाक शेख व प्रदीप गायकवाड हे तिघे पुन्हा पाच वाजता हॉटेलमध्ये कोयता घेऊन येऊन शिवीगाळ, दमदाटी करत हॉटेल कामगारांना धमकी देत हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याला कोयत्याने मुंडके तोडण्याची धमकी देऊन दहशत माजवत निघून गेले. याबाबत हॉटेल चालक सुरेश भांगे यांनी शिरुर पोलिस स्टेशन फिर्याद दिल्याने पोलिसांनी शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड या तिघांवर भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हे दाखल केले होते.
त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, सचिन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांनी शिरुर शहरातील रेणुका माता मंदीर परिसरात सापळा रचून शाहिद गफुर शेख, सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख व प्रदिप भाउसाहेब गायकवाड तिघे (रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर) यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील कोयता जप्त करुन अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…