शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी ता. शिरूर येथील वंदना कैलास घोडे वय 42 वर्ष या महिलेचा आज रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बेल्हा – जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला असुन. टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला आहे.
पाच – सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुलींची लग्नं आटोपून, एकुलता एक मुलगा दत्तात्रयच्या सहवासात वंदना घोडे आयुष्याची गाडी रेटत होत्या. घर चालवण्यासाठी टाकळी हाजी येथील बँका, पतसंस्था, सोसायटी, सोनारांची दुकाने, दवाखाने अशा ठिकाणी साफसफाईचं काम करून उदरनिर्वाह करत होत्या. मुलगा दत्तात्रय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. आजी,आजोबा,वडील आणि आता आई हरपल्याने दत्तात्रय मात्र आता एकटा पडला आहे.
शुक्रवारी बांधकाम मजूर कल्याण योजनेतून पाबळ येथे भांड्यांचे वाटप होत असल्याने वंदना गावातील तरुण लक्ष्मण उर्फ पिंटू घोडे याच्यासोबत दुचाकीवर पाबळला गेल्या , तेथे भांडी उपलब्ध न झाल्याने ते केंदुर कडे चालले होते. मात्र महादेववाडी जवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकर क्र. एमएच १४ एलएक्स ६४६६ ने धडक दिली. दुचाकी घसरून लक्ष्मण कडेला फेकला गेला, तर वंदना रस्त्यावर पडल्या. यावेळी वेगाने टँकर पुढे गेल्याने चाकाखाली वंदना चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला.या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीवर मात करत पोटाची खळगी भरणाऱ्या वंदना यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण टाकळी हाजी गाव शोकसागरात बुडाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना दवाखान्यात हलविले. या प्रकरणी लक्ष्मण गयाभाऊ घोडे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले (रा. कडूस, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…