मुख्य बातम्या

हृदयद्रावक; कारेगावमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू तर दोघांवर उपचार सुरु

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) शिरुर तालुक्यातील कारेगाव परिसरात सोमवार दि २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलांची नावे अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८, दोघेही रा. कारेगाव) अशी आहेत. हि घटना संध्याकाळी सुमारे ५.४५ च्या सुमारास कारेगाव हद्दीतील बाभुळसर शिवारातील शेततळ्यावर हि दुर्दैवी घटना घडली.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण पवार यांची मुले आदेश (१४) आणि अनमोल (१३), तसेच त्यांचे मित्र कृष्णा राखे (८) आणि स्वराज शिरसाठ (१३) हे चौघेही शेततळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र यातील अनमोल आणि कृष्णा हे दोघे पाण्यात बुडाले. आसपासच्या तरुणांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर दोन मुलांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे कारेगाव परिसरात शोककळा पसरली असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

हि घटना घडल्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस हवालदार तेजेस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल आकाश सवाने, किशोर शिवणकर यांनी भेट दिली.

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

शिरुर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

9 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

16 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

16 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

17 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

17 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

17 तास ago