रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये बोगस माथाडीच्या पावत्या दाखवत जबरदस्तीने खंडणी वसुल केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये अमोल शिवाजी मलगुंडे तसेच प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे या दोन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज मुस्ताक साह (वय 31 वर्षे) मूळ रा. कानामाऊ पो. खुटहन, जि जौनपुर, उत्तर प्रदेश. सध्या रा. कळंबोली खेडोपाडा, नवले नवी मुंबई या वाहनचालकाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि 6) रोजी रांजणगाव MIDC मधील ढोकसांगवी गावच्या हद्दीतील झामिल स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीच्या गेट बाहेर सकाळी 10 च्या दरम्यान फिर्यादी व ड्रायव्हर नामे मोहम्मद सुलतान वकील खान ट्रक क्रमांक एम एच 46 बी एम 4471 आणि एम एस 46 बी यु 3863 यामध्ये लोखंडी कॉईल भरून जामीन स्टील इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये खाली करण्यासाठी आले असता 1) अमोल शिवाजी मलगुंडे 2) प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे यांनी फिर्यादी यांना कंपनीमध्ये गाडी खाली करायची असेल तर माथाडी बोर्डाची पावती पाडावी लागेल असे सांगितले आणि त्या दोघांनी संगणमताने एका गाडीचे प्रत्येकी चारशे रुपये याप्रमाणे दोन गाड्यांची एकूण आठशे रुपयांची खंडणी घेऊन त्यांना “जय मल्हार इंडस्ट्रियल सर्व्हिसेस” या नावाने माथाडी बोर्डाचा कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्या.
त्यामुळे फिर्यादी यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस नाईक, पांडुरंग साबळे यांनी आरोपीना तात्काळ अटक केली.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…