मुख्य बातम्या

बेट भागात जागरण गोंधळाच्या नावाखाली उडणार राजकीय धांदल?

निवडणुकीआधीच इच्छुक उमेदवारांमध्ये शक्तिप्रदर्शनाची स्पर्धा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एका बाजूला ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या नावाखाली मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला जागरण–गोंधळ आणि जंगी भोजनाच्या माध्यमातून जनसमर्थनाची हवा निर्माण करण्याची धडपड सुरू असल्याने बेट भागात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

कवठे येमाई येथे एका इच्छुक जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने पंचायत समिती सदस्य इच्छुक उमेदवारासह मोठ्या थाटात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता दुसऱ्या जिल्हा परिषद पदासाठी इच्छुक इच्छुक उमेदवाराने टाकळी हाजी येथे भव्य जागरण–गोंधळ व सामूहिक भोजनाचे आयोजन करून शक्तिप्रदर्शना साठी नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम आचारसंहिता लागू होण्याआधीच जाणीवपूर्वक आखले जात असून, प्रशासनाची नजर चुकवून अप्रत्यक्ष प्रचार सुरू असल्याची चर्चा बेट भागातील ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. “ या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे राजकीय प्रचार जोरदार रित्या सुरू असून त्याचा किती प्रभाव मतदानावर पडतो. हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

आता या कार्यक्रमांना किती गर्दी जमणार, कोणत्या कार्यकर्त्यांची, राजकीय नेत्यांची उपस्थिती असते आणि त्यामागील राजकीय हेतू किती उघड होतो. याकडे आता संपूर्ण बेट भागातील जनतेचे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीपूर्वीच सुरू झालेली ही शक्तिप्रदर्शनाची लढाई पुढे किती चिघळते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

22 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

22 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago