बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. यामुळे आपले विचार, आठवणी, हालचाल, भावना, बुद्धिमत्ता आणि वर्तन समजून येते. मुलांचा मेंदूचा विकास व्हावा यासाठी आई-वडिल अनेक प्रयत्न करत असतात. त्यांच्या आहारात अनेक बदल करतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांच्या विकासाला योग्य ती चालना मिळत नाही. सध्या पालकांसह मुलांच्या आयुष्यातही अनेक बदल घडताय. ज्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होताना दिसून येत आहे.
पालकांच्या आणि मुलांच्या काही वाईट सवयींमुळे मेंदूचा विकास थांबतो. ज्यामुळे मुलांची बुद्धी अधिक तल्लख होण्यापेक्षा ती कमकुवत होतेय. मुलांच्या डोळे, मेंदू आणि पाठीचा मणका यांवर विपरीत परिणाम होतो आहे. जर तुमच्या किंवा मुलांच्या या ४ वाईट सवयी असतील तर वेळीच थांबायला हवं.
1) वाढता स्क्रिन टाइम
मुलांना हल्ली खाताना मोबाईल किंवा फोन पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर देखील पडत नाही. सतत त्या फोनमध्ये अडकून असतात. आपले मुल शांत बसावे यासाठी पालक देखील त्यांच्या हातात फोन देतात. परंतु, यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीसह, सोशल स्किल आणि डोळ्यांवर परिणाम होत आहे. त्यांच्या मेंदूच्या विकासात अनेक अडथळे येताय. ज्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल तर व्यवस्थित होत नाही तसेच मानसिक संतुलन देखील बिघडते.
2) सिगारेट
अनेक पालकांना स्मोकिंग करण्याची सवय असते. परंतु, बरेचदा ही सवय इतकी वाढते की, त्यांना आपण कुठे आहोत याचे भान राहात नाही. अनेक पालक मुलांसमोर स्मोकिंग करतात. डॉक्टरांच्या मते त्यातून निघणारा धूर हा पालकांसह मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असणारे केमिकल, नकोटिन मुलांच्या मेंदूवर सहज परिणाम करतात. ज्यामुळे ब्रेन डॅमेंज होण्याची शक्यता अधिक असते.
3) गोड खाण्याची इच्छा होणे
अनेकदा लहान मुलांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. सारखे गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूचा विकासात अडथळे येतात, तर ब्रेन सेल्स डॅमेज होण्याची देखील अधिक शक्यता असते. यामुळे स्मरणशक्तीसह मानसिक तणाव देखील वाढतो.
4) पुरेशी झोप न घेणे
वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना लगेच झोप लागत नाही. सतत फोन पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. चश्मा लागणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. पुरेशी झोप न घेतल्यास अगदी कमी वयात मेंदूचा विकास थांबतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, मूड स्विंग्स आणि नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी येतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…