आरोग्य

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा

बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. यामुळे आपले विचार, आठवणी, हालचाल, भावना, बुद्धिमत्ता आणि वर्तन समजून येते. मुलांचा मेंदूचा विकास व्हावा यासाठी आई-वडिल अनेक प्रयत्न करत असतात. त्यांच्या आहारात अनेक बदल करतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांच्या विकासाला योग्य ती चालना मिळत नाही. सध्या पालकांसह मुलांच्या आयुष्यातही अनेक बदल घडताय. ज्याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होताना दिसून येत आहे.

पालकांच्या आणि मुलांच्या काही वाईट सवयींमुळे मेंदूचा विकास थांबतो. ज्यामुळे मुलांची बुद्धी अधिक तल्लख होण्यापेक्षा ती कमकुवत होतेय. मुलांच्या डोळे, मेंदू आणि पाठीचा मणका यांवर विपरीत परिणाम होतो आहे. जर तुमच्या किंवा मुलांच्या या ४ वाईट सवयी असतील तर वेळीच थांबायला हवं.

1) वाढता स्क्रिन टाइम

मुलांना हल्ली खाताना मोबाईल किंवा फोन पाहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते घराच्या बाहेर देखील पडत नाही. सतत त्या फोनमध्ये अडकून असतात. आपले मुल शांत बसावे यासाठी पालक देखील त्यांच्या हातात फोन देतात. परंतु, यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीसह, सोशल स्किल आणि डोळ्यांवर परिणाम होत आहे. त्यांच्या मेंदूच्या विकासात अनेक अडथळे येताय. ज्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल तर व्यवस्थित होत नाही तसेच मानसिक संतुलन देखील बिघडते.

2) सिगारेट

अनेक पालकांना स्मोकिंग करण्याची सवय असते. परंतु, बरेचदा ही सवय इतकी वाढते की, त्यांना आपण कुठे आहोत याचे भान राहात नाही. अनेक पालक मुलांसमोर स्मोकिंग करतात. डॉक्टरांच्या मते त्यातून निघणारा धूर हा पालकांसह मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यात असणारे केमिकल, नकोटिन मुलांच्या मेंदूवर सहज परिणाम करतात. ज्यामुळे ब्रेन डॅमेंज होण्याची शक्यता अधिक असते.

3) गोड खाण्याची इच्छा होणे

अनेकदा लहान मुलांना सतत गोड खाण्याची इच्छा होते. सारखे गोड पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मेंदूचा विकासात अडथळे येतात, तर ब्रेन सेल्स डॅमेज होण्याची देखील अधिक शक्यता असते. यामुळे स्मरणशक्तीसह मानसिक तणाव देखील वाढतो.

4) पुरेशी झोप न घेणे

वाढत्या स्क्रिन टाइममुळे मुलांना लगेच झोप लागत नाही. सतत फोन पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो. चश्मा लागणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. पुरेशी झोप न घेतल्यास अगदी कमी वयात मेंदूचा विकास थांबतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे, मूड स्विंग्स आणि नवीन गोष्टी शिकण्यात अडचणी येतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

5 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

5 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

5 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

11 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

11 तास ago