आरोग्य

अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व उपचार

चामखीळ म्हणजे काय

चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो.

चामखीळ येण्याची कारणे

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले चामखीळ नखाने कोचत राहणे यासारख्या सवयीमुळे चामखीळीतील स्त्राव शरीराच्या इतर ठिकाणीही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसमुळे चामखीळ शरीराच्या इतर भागातही पसरत असतात. अशाप्रकारे शरीरावर चामखीळ येतात. यासाठी चामखीळ असल्यास त्यावर नखाने कोचत राहणे टाळावे.

तसेच चामखीळची लागण ही एकाकडून दुसऱ्याला होऊ शकते. यासाठी एकमेकांचे रेजर, अंतर्वस्त्रे, टॉवेल, कपडे, साबण, कंगवा इत्यादी वस्तू वापरणे टाळावे.

चामखीळचे प्रकार

चामखीळचे एकूण पाच प्रमुख प्रकार (types) असतात. प्रत्येक प्रकारचे चामखीळ शरीराच्या वेगवेगळ्या भागावर येत असतात तसेच त्यांचे स्वरूपही वेगवेगळे असते.

1) Common warts

2) Plantar warts

3) Flat warts

4) Filiform warts

5) Periungual warts

ह्या प्रकारचे चामखीळ शरीरावर कोठेही होऊ शकतात त्यातही बोटांवर अधिक प्रमाणात येतात.

2) Plantar warts: ह्या प्रकारचे चामखीळ पायाच्या तळव्यात येतात. इतर चामखीळ त्वचेच्या वर येत असतात तर या प्रकारातील चामखीळ पायाच्या तळव्याच्या त्वचेच्या आत येत असतात.

3) Flat warts: ह्या प्रकारचे चामखीळ चेहरा, हात आणि पायावर येतात.ह्या प्रकारचे चामखीळ नाक व तोंडाभोवती तसेच मानेवर आणि हनुवटीच्या खाली येतात.

4) Periungual warts: ह्या प्रकारचे चामखीळ नखांच्या आत येतात. यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होऊन त्या ठिकाणी वेदना होत असतात. चामखीळ ज्या HPV व्हायरसमुळे येतात त्या HPV व्हायरसचे 100 हून अधिक प्रकार आहेत. हातापायावर येणारे चामखीळ हे फारसे धोकादायक नसतात. मात्र काही वेळा गुप्तांगावरही चामखीळ येऊ शकतात. त्याला genital warts असे म्हणतात. स्त्रियांमध्ये गुप्तांगावर येणाऱ्या चामखीळमुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.

कुठल्याही प्रकारचे बाह्य त्वचेवरील चामखीळीसाठी ऑपरेशन, जालीम उपाय यांची गरज पडत नाही. केवळ बारीक दोऱ्याने घट्ट बांधल्यास तेथील रक्ताभिसरण थांबून चार-पाच दिवसांत ते कडक होऊन गळून पडते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

6 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

6 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

6 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

6 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

6 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

6 तास ago