बॅड कोलेस्टेरॉल शरीरात जमा होणारा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात एक म्हणजे गुड कोलेस्टेरॉल आणि दुसरं म्हणजे बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. पण हेच जर वाढलं तर ते बॅड कोलेस्टेरॉल असतं जे हृदयासाठी खूप घातक असतं. आजकाल भरपूर लोकांना बॅड कोलेस्टेरॉलची समस्या होत आहे. याला कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतं आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्टेरॉल बाहेर काढणं खूप महत्वाचं असतं.
चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे जसं बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढतं, तसं काही खास गोष्टी खाऊन याला कंट्रोलही केलं जाऊ शकतं. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी अशाच एक नॅचरल ड्रिंकबाबत सांगितलं आहे.
काय लागेल साहित्य
स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला 1 कप ताजी पालक लागेल. एक मध्यम आकाराचं केळ घ्या. एक छोटा चमचा फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया घ्या. अर्धा कप ताजं दही घ्या. या सगळ्या गोष्टी एका मिक्सरमध्ये टाका आणि स्मूदी तयार करा. गोडवा हवा असेल तर यात तुम्ही एक छोटा चमचा मधही टाकू शकता.
कसा मिळतो फायदा
पालक: पालकात फायबर भरपूर असतं, ज्यामुळे आतड्यांमध्ये जमा कोलेस्टेरॉलचं अवशोषण कमी होतं आणि शरीरात जमा अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर निघतं.
केळ: केळ्यांमध्ये फायबरसोबतच पोटॅशिअमचं प्रमाणही भरपूर असतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.
दही: दह्यातील प्रोबायोटिक्समुळे पचन तंत्र मजबूत राहतं, ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास मदत मिळते.
अळशीच्या बिया: अळशीच्या बिया शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप फायदेशीर असतं. या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. ही स्मूदी तुम्ही रोज एकदा सकाळी नाश्त्याआधी आणि नंतर एकदा दुपारच्या जेवणाआधी पिऊ शकता. 1 ते 2 महिने नियमितपणे ही स्मूदी प्याल तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…