पाणी हे जीवन आहे. पाणी शरीरासाठी आणि जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. पण आजकाल पाणी फार दूषित होत चाललं आहे. यात अनेक केमिकल्स, विषारी तत्व आढळतात. अशात पाणी फिल्टर करून पिण्याचा सल्ला दिला जातो. फार पूर्वीपासून पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळलं जातं. सोबतच कोमट पाणी प्यायल्याने शरीरालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, एक महत्वाची बाब म्हणजे पाणी वेगवेगळ्या पद्धतीने उकळलं जाऊ शकते आणि याचे फायदेही वेगवेगळे मिळतात.
पाणी वेगवेगळ्या पद्धतीने उकळून प्यायल्याने वात, कफ आणि पित्त दोषामुळे होणाऱ्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
पाणी उकळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
जर पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहण्यापर्यंत उकळलं तर याने वात दोष दूर होतो.
जर पाणी अर्ध कमी होईपर्यंत उकडलं तर याने पित्त दोष कमी होतो.
जर पाणी उकळल्यानंतर केवळ एक चतुर्थांश शिल्लक राहीलं तर याने कफ दूर होतो.
अशाप्रकारे पाणी उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि तापही कमी होतो.
कफ दोषाची लक्षण
कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरावर चिकटपणा जाणवतो. कफ जमा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, चिकट घाम, शरीर जड वाटणे, सुस्ती, आळस, जास्त झोप येणे अशी लक्षणं दिसतात.
पित्त दोषाची लक्षण
पित्त वाढल्यावर व्यक्तीला फार जास्त थकवा जाणवतो, जास्त झोप येते, शरीरात जळजळ होते, जास्त गरमी लागते, जास्त घाम येतो, शरीरातून दुर्गंधी येते, चिडचिड जास्त होते, चक्कर येते, लघवी पिवळी येते, डोळेही पिवळे दिसू लागतात.
वात दोषाची लक्षण
वात दोषाला हवेशी जोडण्यात आलं आहे. वात असंतुलित झाला तर पोट खराब होतं, बद्धकोष्ठता होते, पोटात दुखतं, गॅस होतो, तोंडाची चव कडवट होते, हाडांमध्ये वेदना होतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…