आरोग्य

आळंबीची भाजी असते आरोग्यदायी

आळंबी ही भाजी तशी अलीकडे जास्त लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. इतर भाज्यांच्या तुलनेत मश्रुममध्ये अधिक पोषक घटक असतात. मश्रुममध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असते. तर गहू, तांदूळ यामध्ये या आम्लाचे प्रमाण खूप कमी आहे. मनुष्याला संतुलित आहार गरजेचा असतो आणि हे आम्ल त्यामध्ये आवश्यक असते. मश्रुममध्ये असलेले अँटिऑक्सिडंटमुळे फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. मश्रुम एक नैसर्गिक प्रतिजैविकही आहे. त्यामुळे सूक्ष्म जीवांचे आणि इतर बुरशीजन्य संसर्ग बरे होण्यास मदत होते.

मश्रुम रक्तदाबाचा आजार नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी मश्रुमचे अवश्य सेवन करावे.

कार्बोहायड्रेटचे प्रमाण पुरेसे असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, पित्त आदी पोटाचे विकार दूर करण्यास, तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि शर्करा यांचे शोषण कमी करण्यास मदत करतो. मधुमेही व्यक्तींसाठीही मश्रुम चांगले असतात. त्यातून जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. मश्रुममध्ये चरबी, साखर तसेच कार्बोहायड्रेट नसतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना मश्रुम सेवनाचे फायदेच होतात. मश्रुम सेवनाने शरीराल इन्सुलिनची निर्मिती होते.

मश्रुममध्ये लीन प्रथिने असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मश्रुम उपयुक्त आहे. स्थूलपणा कमी करण्यासाठी प्रोटिन डाएट किंवा प्रथिनांचा आहार सेवन करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना मश्रुम सेवन करणे फायद्याचे आहे.

मश्रुममध्ये सोडियम नाही. त्यामुळे स्थूलपणा, मूत्रपिंडाचे आजार किंवा हृदयरोग आदींमध्ये मश्रुमचे सेवन फायदेशीर आहे. हृदयरुग्णांसाठी कोलेस्ट्रॉल, चरबी तसेच सोडियम सॉल्ट हे धोकादायक असते. त्यामुळे मश्रुमचे सेवन जरूर करू शकतात.

मश्रुममध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. पण मश्रुम रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कायम राखण्यास मदत करते. मश्रुममध्ये फॉलिक अ‍ॅसिड असते. मांसाहारी लोकांना त्याची कमतरता नसते. कारण, आहारातील फॉलिक अ‍ॅसिड हे फक्त मांसाहारातून मिळते. पण, शाकाहारी व्यक्तींसाठी मश्रुमचा पर्याय आहे. लोह आणि फॉलिक अ‍ॅसिड यामुळे ग्रामीण भागात ज्या महिलांमध्ये, मुलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच रक्ताल्पता हा विकार असतो, त्यांच्यासाठी मश्रुमचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला पर्याय म्हणून, चवीत बदल म्हणून कधी तरी का होईना; पण मश्रुम सेवन करण्यास हरकत नाही. भाज्यांमध्ये, सलाडमध्ये किंवा नुसती भाजी म्हणून मश्रुम आहारात जरूर सामील करावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

7 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

7 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

8 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

10 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

1 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

2 दिवस ago