आळंबी ही भाजी तशी अलीकडे जास्त लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. इतर भाज्यांच्या तुलनेत मश्रुममध्ये अधिक पोषक घटक असतात. मश्रुममध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असते. तर गहू, तांदूळ यामध्ये या आम्लाचे प्रमाण खूप कमी आहे. मनुष्याला संतुलित आहार गरजेचा असतो आणि हे आम्ल त्यामध्ये आवश्यक असते. मश्रुममध्ये असलेले अँटिऑक्सिडंटमुळे फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. मश्रुम एक नैसर्गिक प्रतिजैविकही आहे. त्यामुळे सूक्ष्म जीवांचे आणि इतर बुरशीजन्य संसर्ग बरे होण्यास मदत होते.
मश्रुम रक्तदाबाचा आजार नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी मश्रुमचे अवश्य सेवन करावे.
कार्बोहायड्रेटचे प्रमाण पुरेसे असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, पित्त आदी पोटाचे विकार दूर करण्यास, तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि शर्करा यांचे शोषण कमी करण्यास मदत करतो. मधुमेही व्यक्तींसाठीही मश्रुम चांगले असतात. त्यातून जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. मश्रुममध्ये चरबी, साखर तसेच कार्बोहायड्रेट नसतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना मश्रुम सेवनाचे फायदेच होतात. मश्रुम सेवनाने शरीराल इन्सुलिनची निर्मिती होते.
मश्रुममध्ये लीन प्रथिने असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मश्रुम उपयुक्त आहे. स्थूलपणा कमी करण्यासाठी प्रोटिन डाएट किंवा प्रथिनांचा आहार सेवन करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना मश्रुम सेवन करणे फायद्याचे आहे.
मश्रुममध्ये सोडियम नाही. त्यामुळे स्थूलपणा, मूत्रपिंडाचे आजार किंवा हृदयरोग आदींमध्ये मश्रुमचे सेवन फायदेशीर आहे. हृदयरुग्णांसाठी कोलेस्ट्रॉल, चरबी तसेच सोडियम सॉल्ट हे धोकादायक असते. त्यामुळे मश्रुमचे सेवन जरूर करू शकतात.
मश्रुममध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. पण मश्रुम रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कायम राखण्यास मदत करते. मश्रुममध्ये फॉलिक अॅसिड असते. मांसाहारी लोकांना त्याची कमतरता नसते. कारण, आहारातील फॉलिक अॅसिड हे फक्त मांसाहारातून मिळते. पण, शाकाहारी व्यक्तींसाठी मश्रुमचा पर्याय आहे. लोह आणि फॉलिक अॅसिड यामुळे ग्रामीण भागात ज्या महिलांमध्ये, मुलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच रक्ताल्पता हा विकार असतो, त्यांच्यासाठी मश्रुमचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला पर्याय म्हणून, चवीत बदल म्हणून कधी तरी का होईना; पण मश्रुम सेवन करण्यास हरकत नाही. भाज्यांमध्ये, सलाडमध्ये किंवा नुसती भाजी म्हणून मश्रुम आहारात जरूर सामील करावा.
(सोशल मीडियावरुन साभार)
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…