आरोग्य

अळू्ची कंद म्हणजे बटाटा आहे तरी कसा

अळूच्या पानांबरोबरच अळू्च्या कंदाचा म्हणजेच अळकुडी /अरवीचा वापरही होतो. हा कंद पचायला जड, शरीराला पोषक, वातूळ आहे. आमसूल टाकून मीठाच्या पाण्यात उकडून तसाच खायला छान लागतो. उकडलेल्या अळकुड्या सोलून भाजी केली जाते. अशा या अळवाच्या कंदभाजीने जर अजीर्ण झाले तर तांदुळाचे धुवण म्हणजे तांदुळ धुतलेले पाणी हे औषध.

अळकुडी म्हटल्याबरोबर त्याच्याच जातकुळीतल्या बटाट्याची आठवण झालीच असेल. बटाटा ही सुद्धा कंदभाजी. मुळात भारतातील नाही. पोर्तुगीज आणि इंग्रजानी हा भारतात रुजवला. परंतु आज बटाट्याशिवाय सगळे अडते, अशी परिस्थिती होऊन बसलीय.

मग हा बटाटा नेमका आहे तरी कसा

बटाटा गुणाने गोड, पचायला जड, वातकफकर, जाडी वाढविणारा आहे.

लहान मुले इतर भाज्या खात नाहीत आणि बटाटा तेवढा आवडीने खातात, म्हणून पहिल्यापासून बटाट्याची भाजी, पराठा, चीप्स, वेफर अशी सवय मोठ्यांकडून लावली जाते. मुलांच्या या सवयी पुढे फारशा बदलत नाहीत. अगदी बरीच मोठी माणसे सुद्धा बटाट्याला प्राधान्य देतात. भाज्यांच्या किमती बघता बटाटा ज्यात त्यात घातल्याशिवाय पर्याय नाही असेही होते.

बटाट्याच्या अति वापराने स्थौल्य वाढीस लागते आणि स्थौल्याबरोबरीने येणारे आजार मागावून आपोआप येतातच. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने थोडा विचार करायलाच हवा ना

लहान मुलाना केवळ बटाट्याची सवय लावू नये. पराठे, भजी इ पदार्थ करताना केवळ बटाटा न वापरता इतर भाज्यांचा वापर युक्तीने करावा.

वेफर, potato chips इत्यादि स्वरूपात बटाटा तळून वापरला तर तो अजूनच पचायला जड. पाण्यात शिजवून वापरला, तर तळलेल्या बटाट्य़ापेक्षा जरा बरा. परंतु वारंवार आणि पूर्णपणे केवळ बटाट्याची भाजी खाणे टाळलेलेच बरे.

परंतु जर बटाटा भाजून शिजवला तर ? द्रव्य भाजल्यामुळे त्यातील जलांश कमी होऊन पचायला हलके होते, हा नियम आपल्याला माहितच आहे. चुलीमध्ये निखाऱ्यात बटाटे ठेवून भाजून खाण्याची मजा काहीनी नक्कीच घेतली असेल. हो. अगदी तस्साच बटाटा चुलीत भाजून त्याची भाजी त्यातल्या त्यात उत्तम. घरात grill वर भाजणे हाही पर्याय आहेच. पण हे सगळ्यांना शक्य नाही. ज्याला जमेल त्याने नक्की करावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

14 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

14 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

14 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago