आरोग्य

नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्याने जबरदस्त फायदे

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न तेलाच्या गुळणी संदर्भात निर्मान होतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तेलाची गुळणी केल्याने फायदे होतात.

तेलाची गुळणी कशी करावी?
तेलाची गुळणी करण्यासाठी शुध्द, नैसर्गिक स्वरुपातलं, घाण्याचे किंवा आयुर्वेद दुकानात मिळणारं नारळाचं तेल वापरावं. एक चमचा नारळाचं तेल घ्यावं. ते तोंडात टाकावं. तोंड बंद करुन तेल संपूर्ण तोंडात फिरवावं. तेल तोंडात फिरवताना हळू फिरवाव. ते गिळू नये. एक मिनिटानंतर गुळणी बाहेर टाकावी. तेलाची गुळणीची सवय लावताना सुरुवातीला केवळ एक मिनीट गुळणी धरावी आणि मग हा वेळ पुढे 10-15 मिनिटापर्यंत वाढवता येतो. तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करुन चालत नाही. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावी लागते.

गुळण्या नारळाच्या तेलानेच का कराव्यात?
सूर्यफूल, ऑलिव्ह ऑइलयापेक्षाही नारळाचं तेल गुळण्यांसाठी फायदेशीर ठरतं. नारळाच्या तेलात दाह विरोधी आणि सूजविरोधी घटक असतात. तसेच नारळाच्या तेलाद्वारे तोंडात आरोग्यास घातक जिवाणुंची, सूक्ष्म जिवाणुंची वाढ होत नाही.

नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्याचे फायदे
१) नारळाच्या तेलाची गुळणी केल्याने तोंडातील घातक जिवाणू नष्ट होतात. दातांची संवेदनशिलता कमी होते.
२) शरीरावर सूज येत असल्यास, हिरड्यांना सूज असल्यास नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं सूज दूर होते.
३) नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते.
४) नारळाच्या तेलाची गुळणी करण्याचा सर्वात जास्त फायदा पचन व्यवस्थेला होतो. पचनाची सर्वात आधीची प्रक्रिया जिभेशी निगडित असते. जिभेद्वारे पदार्थातील पोषक तत्त्वांची जाणीव होऊन पचन व्यवस्थेला तसे आदेश जातात आणि पचनाची प्रक्रिया सुरु होते. पण जीभच जर अस्वच्छ असेल तर पचन व्यवस्थेला जिभेकडून कोणतेही संकेत मिळत नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास समस्यान निर्माण होतात. पचनाशी निगडित समस्या दूर करण्यासाठी नारळाच्या तेलाच्या गुळण्या फायदेशीर ठरतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

9 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

9 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

9 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

9 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

11 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

11 तास ago