आरोग्य

पावसाळ्यात सततच्या सर्दी-खोकल्यानं वैतागलात? करा ‘हे’ ४ आयुर्वेदिक उपाय

पावसाळा आला की, सर्दी-पडसा, खोकला आणि ताप या समस्या होणं फारच कॉमन आहे. वातावरणात बदल, वायरल इन्फेक्शन आणि कमजोर इम्यूनिटीमुळे या समस्या होतात. बरेच लोक तर असेही असतात ज्यांचं सतत नाक वाहत राहतं. औषधं घेऊनही आराम मिळत नाही. अशात सतत औषधं घेणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं. आधीच सायनस असलेल्यांना तर अधिक त्रास होतो. पण तुम्हाला माहीत नसेल की, तुमच्या किचनमध्येच या समस्या दूर करणारे नॅचरल उपाय लपलेले आहेत.

सूंठ सिद्ध जल

सूंठ सिद्ध जल म्हणजेच पाणी हे सूंठापासून तयार केलं जातं. या पाण्यानं पचनक्रिया सुधारते, घशाला आराम मिळतो आणि छातीत जमा झालेला कफही बाहेर पडतो. हे तयार करण्यासाठी एक लीटर पाणी घ्या, त्यात अर्था चमचा सूंठ पावडर किंवा ताज्या आल्याचा एक तुकडा टाका. मध्यम आसेवर हे पाणी १० मिनिटं उकडा. पाणी गाळून थंड होऊ ग्या आणि स्टीलच्या बॉटलमध्ये भरून थोडं थोडं प्या.

DIY हर्बल मिश्रण

अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आल्याचं पावडर, १ काळी मिरी किंवा दोन चिमुट काळी मिरी पूड, १ चमचा मध घ्या. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा जेवणाच्या एक तास आधी खा.

दिवसातून दोनदा वाफ

वाफ सर्दी-पडसा दूर करण्यास खूप फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी २ ग्लास पाणी घ्या, त्यात मुठभर तुळशीची पानं, ५ ते ७ पुदिन्याची पानं, १ चमचा ओवा, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा हळद टाका. हे पाणी ७ ते १० मिनिटं मध्यम आसेवर उकडा. या पाण्याची वाफ घ्या.

हळदीच्या पाण्यानं गुळण्या

हा एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. हे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या, त्यात १ चमचा हळद टाका आमि ३ ते ५ मिनिटांसाठी उकडा. हे पाणी कोमट असेल तेव्हा दिवसातून २ ते ३ वेळा गुरळा करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

11 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

11 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

11 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

15 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

16 तास ago