पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात आर्द्रता आणि चिकटपणा वाढतो ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो.
पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेवर मुरुम, फोड, खाज सुटणे, पुरळ आणि टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ लागते. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर काय लावायला हवे पाहूया.
त्वचा आपल्याला फ्रेश आणि चमकदार हवी असेल गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चयराझ होते. तसेच त्वचेवरील घाण, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
कोरफडीचा गर हा त्वचेसाठी चांगला असतो. यामुळे त्वचेला थंडावा आणि ओलावा मिळतो. हा गर नियमितपणे लावल्यास त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी होते.
काकडीचा रस हा त्वचेसाठी चांगला मानला आहे. यामुळे त्वचेला थंडावा आणि ओलावा मिळतो. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेवरील डाग, मुरुमे आणि काळी वर्तुळे काढून टाकण्यास मदत करतात.
मुलातानी माती त्वचेवरी घाण, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्वचेला थंड करते. ज्यामुळे डाग, मुरुमे आणि टॅनिंगची समस्या दूर करते.
बेसन त्वचेवर लावल्याने मृत पेशी, घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते. ज्यामुळे त्वचेवरील चिकटपणा दूर होतो. १० ते १५ मिनिटे बेसन लावून चेहरा थंड पाण्याने धुवा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…