kadunimb
आपल्या आयुर्वेदात कडुलिंबाचे अनेक फायदे सांगितले आहेत. गुढीपाडवा सणाच्या दिवशी आपण कडुलिंबाची दोन पान तरी खातो. कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
१) दातांच्या स्वच्छतेसाठी कडुलिंबाची काडी खूप उपयोगी आहे. याच्या नियमित वापराने दात स्वच्छ आणि निरोगी रहातात. तोंडाला दुर्गंधी येत नाही. श्वास फ्रेश रहातो. यामुळेच अनेक टुथ पेस्टमध्ये कडुलिंब वापरला जातो.
२) अनेक प्रकारचे त्वचा रोग कडुलिंबामुळे बरे होतात. अंघोळीच्या गरम पाण्यात कडु लिंबाची काही पाने टाकावी. कांजण्या, गोवर या आजारातदेखील फायदा होतो. चेहऱ्यावरील फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस लावावा. याचा अँटीसेप्टिक म्हणून उपयोग होतो.
३) पोटाचे विकार असल्यास सुमारे चमचाभर कडुलिंबाच्या रसात मध आणि मिरीपूड घालून प्यावे. पोटातील कृमी व जंत नाहीसे होण्यास मदत होते. रस जास्त घेऊ नये. काही जणांना पित्ताचा त्रास होऊ शकतो.
४) घरात डास व इतर कीटक असल्यास छोटी शेकोटी करून त्यात कडुलिंबाची पाने टाकावी. याचा धूर सगळीकडे पसरू द्यावा. धान्य साठविताना त्यात कडुलिंबाची पाने टाकणे हा एक सुंदर पारंपारिक उपाय आहे. किडे, उंदीर, घुशी यापासून संरक्षण मिळते.
५) केसात कोंडा होणे, उवा होणे असा त्रास असेल, कडुलिंबाची पाने टाकून पाणी उकळावे. या पाण्याने केस धुवावेत. कोंडा कमी होतो. केसांचे आरोग्य सुधारते.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…