Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मुळ्यात इतकी पोषण तत्वे आहेत की जी १०० आजारांवर उपचार करु शकतात.
पोषक तत्वांनी भरपूर मूळा
मुळा पोषक तत्वांनी भरपूर असतो. यात विटामिन सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि विटामिन बी-6 सारखे न्युट्रीशन आढळतात. याशिवाय मुळा फायबर,एंटीऑक्सीडेंट आणि ग्लूकोसायनोलेट्सचा देखील चांगला स्रोत आहे. यामुळे हा मुळा आरोग्यासाठी वरदान मानला जातो. परंतू रात्रीचा मुळा खाण्यापासून वाचले पाहीजे. कारण मुळा हा उष्ण आणि थंड असा दोन्ही गुणधर्माचा असतो. ज्यांनी सर्दी आणि खोकला असेल त्यांनी रात्रीचा मुळा खाऊ नये.
मुळ्याचे फायदे काय
जर एखाद्या व्यक्तीने २ ते ३ महिने सातत्याने मुळा खाल्ला तर तो जीवनात कधीही आजारी पडू शकत नाही. मुळा खाल्ल्याने लिव्हर, किडनी, आतडी, फुप्फुसे, हृदयापासून संपूर्ण डायझेशन एकदम परफेक्ट रहाते. मुळा सेवनाने वजन नियंत्रणात राहाते. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. वात, पित्त दोष होत नाहीत. बीपी, शुगरपासून अनेक आजार बरे होतात.
फॅट कटर म्हणतात
मुळा हा फॅटक कटरचे काम करतो. मुळा डायजेशनसाठी खूपच चांगला आहे. जर तुम्ही सकाळी उपाशी पोठी मुळा खाल्ला तर पचन यंत्रणा एक तंदुरुस्त होते. जर तुम्हाला सकाळी मुळा खायला जमले नाही तर कोणत्याही वेळी मुळा मीठ लावून बाजरीच्या भाकरी सोबत खावा. मुळा खावा आणि कोणत्याही आजाराला मूळापासून दूर करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…