Yथंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात हवामान बदलल्याने अनेक गोष्टी बदलत असतात. हिवाळ्यात काही खास भाज्या बाजारात येत असतात. त्यात मुळ्याची देखील भाजी असते. मुळ्याला अनेक लोक सलाड म्हणून खातात. याच्या पानांची भाजी बनवून खाल्ली जात असते. ही भाजी थंडीत आरोग्याला अनेक फायदे होत असतात. योग गुरु आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव देखील मुळ्याला आरोग्यासाठी वरदान मानत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मुळ्यात इतकी पोषण तत्वे आहेत की जी १०० आजारांवर उपचार करु शकतात.
पोषक तत्वांनी भरपूर मूळा
मुळा पोषक तत्वांनी भरपूर असतो. यात विटामिन सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नीशियम आणि विटामिन बी-6 सारखे न्युट्रीशन आढळतात. याशिवाय मुळा फायबर,एंटीऑक्सीडेंट आणि ग्लूकोसायनोलेट्सचा देखील चांगला स्रोत आहे. यामुळे हा मुळा आरोग्यासाठी वरदान मानला जातो. परंतू रात्रीचा मुळा खाण्यापासून वाचले पाहीजे. कारण मुळा हा उष्ण आणि थंड असा दोन्ही गुणधर्माचा असतो. ज्यांनी सर्दी आणि खोकला असेल त्यांनी रात्रीचा मुळा खाऊ नये.
मुळ्याचे फायदे काय
जर एखाद्या व्यक्तीने २ ते ३ महिने सातत्याने मुळा खाल्ला तर तो जीवनात कधीही आजारी पडू शकत नाही. मुळा खाल्ल्याने लिव्हर, किडनी, आतडी, फुप्फुसे, हृदयापासून संपूर्ण डायझेशन एकदम परफेक्ट रहाते. मुळा सेवनाने वजन नियंत्रणात राहाते. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते. वात, पित्त दोष होत नाहीत. बीपी, शुगरपासून अनेक आजार बरे होतात.
फॅट कटर म्हणतात
मुळा हा फॅटक कटरचे काम करतो. मुळा डायजेशनसाठी खूपच चांगला आहे. जर तुम्ही सकाळी उपाशी पोठी मुळा खाल्ला तर पचन यंत्रणा एक तंदुरुस्त होते. जर तुम्हाला सकाळी मुळा खायला जमले नाही तर कोणत्याही वेळी मुळा मीठ लावून बाजरीच्या भाकरी सोबत खावा. मुळा खावा आणि कोणत्याही आजाराला मूळापासून दूर करा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…