सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.
पानांमध्ये मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, १.९ मोल्स किंवा २.९ एमसीजी व्हिटॅमिन-ए, १३ मायक्रोग्राम व्हिटॅमिन-बी1 आणि ०.६३ ते ०.८९ मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम असते. यासंदर्भात, कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी सुपारीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, याबाबत माहिती दिली आहे.
बद्धकोष्ठतेवर उपाय: अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान रामबाण उपाय म्हणून मानला जातो. यासाठी सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.
श्वासाची दुर्गंधी, दातांचा पिवळेपणा: सुपारीच्या पानात अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणानंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.
श्वसन प्रणालीसाठी: खोकला, ब्राँकायटिस, दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
मधुमेह नियंत्रित करते: सुपारीच्या पानात अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात. टाईप-२ मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…