सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.
पानांमध्ये मधुमेह विरोधी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक विरोधी, व्रण विरोधी आणि संसर्ग विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात १.३ मायक्रोग्रॅम आयोडीन, ४.६ मायक्रोग्रॅम पोटॅशियम, १.९ मोल्स किंवा २.९ एमसीजी व्हिटॅमिन-ए, १३ मायक्रोग्राम व्हिटॅमिन-बी1 आणि ०.६३ ते ०.८९ मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम असते. यासंदर्भात, कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी सुपारीच्या पानांचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात, याबाबत माहिती दिली आहे.
बद्धकोष्ठतेवर उपाय: अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, व पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान रामबाण उपाय म्हणून मानला जातो. यासाठी सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. व सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.
श्वासाची दुर्गंधी, दातांचा पिवळेपणा: सुपारीच्या पानात अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणानंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.
श्वसन प्रणालीसाठी: खोकला, ब्राँकायटिस, दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.
मधुमेह नियंत्रित करते: सुपारीच्या पानात अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात. टाईप-२ मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…