आरोग्य

कमी किंवा अतिघाम येण्याची कारणे

माणसाच्या त्वचेवर घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्वचेखाली असणार्‍या स्वेदग्रंथी मधून जो द्राव तयार करुन त्वचेवर पसरवला जातो, त्याला स्वेद (घाम) म्हणतात. आयुर्वेदाने स्वेद हा एक मल (त्याज्य पदार्थ) मानलेला असला तरी प्रत्येक मलाचेही स्वतःचे असे शरीर उपयोगी कार्य असते. घाम त्वचेला ओलावा पुरवून त्वचा स्निग्ध ठेवतो आणि त्वचेवरील सूक्ष्म रोमांचे धारण करतो. स्वेद (घाम) शरीरा मधील उष्णता बाहेर फेकण्याचे कार्य करतो. वास्तवातही शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य घामाकडून होते.

त्वचेवर स्रवलेल्या घामामध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन थंडावा तयार केला जातो, जो त्वचे खालील रक्तवाहिन्या मधून वाहाणार्‍या रक्ताला थंड करतो. शरीरभर फिरणारे हे रक्त शरीराचे तापमान वाढू देत नाही. घाम स्रवणाऱ्या दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक्क्रिन (Eccrine) आणि एपोक्रिन (Apocrine). यामधील एक्क्रिन प्रकारच्या ग्रंथी शरीरभर आधिक्याने असतात, ज्या त्वचेच्या पृष्ठभागावर उघडतात. एपोक्रिन प्रकारच्या ग्रंथी केसांच्या मुळाशी उघडतात आणि स्वाभाविकच डोके, काख, जांघ अशा ठिकाणी जिथे केस आधिक्याने असतात तिथे आधिक्याने दिसतात.

निरोगी शरीरामधून साधारणपणे ७५० मिलीलीटर इतका घाम दिवसभरातून तयार केला जातो. मात्र सभोवतालचे वातावरण उष्ण असताना घामाचे प्रमाण वाढू शकते. तीव्र उन्हाळ्यात परिश्रमाचे काम करणार्‍या माणसाच्या शरीरामधून तासाभरातून २ ते ४ लीटर आणि दिवसभरातून १० ते १४ लीटर इतक्या प्रचंड प्रमाणात सुद्धा घाम तयार केला जाऊ शकतो, जो अर्थातच त्या कडक उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्याचे काम करतो. शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रणात ठेवण्यात व शरीराला थंडावा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा घाम आधुनिक जगातल्या लोकांना येणार नसेल (ज्याचे कारण असते सभोवतालचे कृत्रिम गार वातावरण) तर अशा मंडळींच्या शरीराचे स्वास्थ्य बिघडणे स्वाभाविक असते. अखंड एसीच्या गार वातावरणात राहणार्‍या, शरीराचा उन्हाशी बाह्य नैसर्गिक वातावरणाशी संपर्क येऊ न देणार्‍या, न चालणाऱ्या, न फिरणार्‍या, खेळ व्यायाम न करणार्‍या अनेकांना जेव्हा घामच येत नाही तेव्हा त्यांना संभाव्य विकृतीचा होतात. काही लोकांमध्ये आणि काही परिस्थिती मध्ये घाम कमी येतो, तर जाणून घेऊ घाम कमी येण्यामागील कारणे.

घाम कमी येण्याचे कारणे 

घाम निर्माण करणार्‍या स्वेद ग्रंथींची मुखे बंद होणे.

जंतुसंसर्ग.

त्वचा आघात, उदा. त्वचा भाजणे वा अपघातात त्वचा फाटणे.

उष्णतेने येणार्‍या पुळ्या, घामोळे.

सोरियासिस हा त्वचाविकार.

स्क्लेरोडर्मा हा त्वचा व शरीरजोडणी करणार्‍या कोषा संबंधित स्व-रोगप्रतिकारशक्ती जनित आजार.

मल्टिपल स्क्लेरोसिस, कंपवात अर्थात पार्किन्सन्स डिसिज, स्मृतिभ्रंश वगैरे केंद्रिय चेतासंस्थे संबंधित आजार.

मधुमेह,रॉस सिन्ड्रोम, ब/जीवनसत्त्वांची कमी, वगैरे स्थानिक नसांना विकृत करणारे आजार.

Hypohidrotic Ectodermal Dysplasia (HED) सारखा दुर्मिळ अनुवंशिक आजार.

विशिष्ट औषधांमुळे. जसे की मानसिक रोगांवरील औषधे, अति रक्तदाबावरील विशिष्ट औषधे.

उन्हाळ्यात जेव्हा शरीरामध्ये उष्णता वाढते तेव्हा ती उष्णता कमी करण्याचे कार्य घाम करतो. मात्र आधुनिक जगात वेगवेगळ्या कारणांमुळे जेव्हा घाम येत नाही तेव्हा शरीरामधून उष्णता बाहेर फेकली जात नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे. शरीरा मधील उष्णता आतल्या आताच राहणे हे शरीर-स्वास्थ्यासाठी कधीही हितकर असू शकत नाही, उलट विविध रोगांना कारणीभूत होऊ शकते. आयुर्वेदाचा हा विचार समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीने घाम आणण्याचे उपाय करायला हवे. दुसरीकडे काही आजारांमध्ये खूप घाम येतो. अति प्रमाणात घाम येण्याची कारणे कोणती ते जाणून घेऊया.

अति प्रमाणात घाम येण्याची कारणे

अतिश्रम, अतिव्यायाम यांसारखी कारणे जी नैसर्गिक समजली पाहिजेत.

मानसिक ताण जसे की- क्रोध, चिंता, कामेच्छा इत्यादी.

मद्यपान.

मलेरिया, व्हायरल ताप, टीबी वगैरे संसर्गजन्य आजार.

थायरॉईड ग्रंथीची अतिकार्यक्षमता.

मधुमेह.

हृदयविकार.

वातरक्त अर्थात गाऊट.

पाठीच्या कण्यामधील मज्जारज्जूला झालेली इजा.

श्वसनवह क्रियेमध्ये बिघाड.

औषधांमुळे,जसे- मानसिक रोगांवरील औषधे, प्रोप्रेनलॉल सारखे अति रक्तदाबावरील औषध, आदी.

अनुवंशिकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

2 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

2 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

7 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

7 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

7 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

7 तास ago