आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. काही जण हे तेल पुन्हा वापरतात. पण पुन्हा वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
तळलेले तेल पुन्हा वापरल्याने हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह किंवा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशावेळी तळलेले तेल फेकून देण्याऐवजी त्याचा पुन्हा वापर कसा करता येईल पाहूया.
तळलेले तेल पुन्हा जेवणात वापरु नका. सगळ्यात आधी त्याचा रंग, वास आणि घट्टपणा तपासा. जर तेल काळसर किंवा चिकट झालं असेल तर फेकून द्या. पण हलकासा रंग बदलला असेल तर गाळून वापरता येईल.
तळणीचे तेल पुन्हा जेवणासाठी वापरु नका. त्याऐवजी लोखंडी वस्तूंची स्वच्छता, गंज काढणे किंवा दरवाज्याच्या कडी- कोयंड्यांना ग्रीसिंग करण्यासाठी वापरु शकतो.
या तेलाचा वापर आपण घराबाहेरील दिव्यांसाठी वापरु शकतो. ज्यामुळे त्याचा पुन्हा वापर होईल.
उरलेलं तेल आपण कंपोस्टमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किंवा किटकांपासून रोपाचं संरक्षण करण्यासाठी वापरु शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…