आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. काही जण हे तेल पुन्हा वापरतात. पण पुन्हा वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते.
तळलेले तेल पुन्हा वापरल्याने हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह किंवा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अशावेळी तळलेले तेल फेकून देण्याऐवजी त्याचा पुन्हा वापर कसा करता येईल पाहूया.
तळलेले तेल पुन्हा जेवणात वापरु नका. सगळ्यात आधी त्याचा रंग, वास आणि घट्टपणा तपासा. जर तेल काळसर किंवा चिकट झालं असेल तर फेकून द्या. पण हलकासा रंग बदलला असेल तर गाळून वापरता येईल.
तळणीचे तेल पुन्हा जेवणासाठी वापरु नका. त्याऐवजी लोखंडी वस्तूंची स्वच्छता, गंज काढणे किंवा दरवाज्याच्या कडी- कोयंड्यांना ग्रीसिंग करण्यासाठी वापरु शकतो.
या तेलाचा वापर आपण घराबाहेरील दिव्यांसाठी वापरु शकतो. ज्यामुळे त्याचा पुन्हा वापर होईल.
उरलेलं तेल आपण कंपोस्टमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी किंवा किटकांपासून रोपाचं संरक्षण करण्यासाठी वापरु शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…