आरोग्य

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते.

आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे आणि अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी काही घरगुती उपाय केल्याने पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.

आपल्या रिकाम्या पोटी ५ पुदिन्याची पाने खावी लागतील. पुदिन्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असणारे घटक पचन सुधारण्यास, डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. तसेच तोंडाची दुर्गंधी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पुदिन्यामध्ये ऍलर्जी-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ऍलर्जीची लक्षणे कमी होतात.

पुदिन्याची पाने खाताना त्यामध्ये चण्याऐवढा भिमसेन कापूर घालून ५ पाने चघळून खावी. किंवा या पानांसोबत खडीसाखर खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. वारंवार त्रास देणाऱ्या पित्ताच्या त्रासकडे दुर्लक्ष करु नका कारण समस्या गंभीर होऊन आजार वाढू शकतो. अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत असेल तर हा उपाय करुन पाहा.

पुदिन्याची पाने खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्यात मध किंवा लिंबू घालून त्याचा चहा प्या. इतकेच नाही तर पुदिन्याची पाने पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्या. जेवणात पुदिन्याची चटणी था. असं केल्याने आपल्याला पित्ताच्या त्रासापासून आराम मिळेल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

21 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

21 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

23 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

23 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

2 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

2 दिवस ago