आरोग्य

सततचा खोकला होईल कमी – घसाही होईल साफ हे आहेत ३ घरगुती काढा

काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल.

खोकल्यासाठी घरगुती उपाय

आले, दालचिनी आणि हळदीचा चहा 

दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. शिवाय खोकला कोणत्याही प्रकारचा असो, याचा त्रास कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात आले, दालचिनी आणि हळद घाला आणि शिजवा. चवीसाठी आपण त्यात मधही घालू शकता. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. चहा गाळून आपण दिवसातून २ वेळा पिऊ शकता.

तुळस, काळी मिरी आणि मध 

तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध एकत्र केल्याने एक शक्तिशाली काढा तयार होतो. या तिन्ही घटकांचे अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तुळशीची पानं, काळी मिरी आणि मध घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आणि चहा गाळून प्या.

मिठाचे पाणी 

घसा खवखवणे आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी तोंडात ठेवून गुळण्या करा. आणि थुंका. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो. ही प्रक्रिया दिवसातून २-३ वेळा करा.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

5 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

5 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

5 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

5 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

7 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

8 तास ago