शरीरातील असे अनेक भाग आहेत जे नाजूक आहेत त्यातील एक कान. कानाला हलकी जरी दुखापत झाली तरी आपल्याला सुचेनासे होते. हल्ली जीवनशैलीनुसार प्रत्येकजण इअरफोन किंवा हेडफोन वापरतात. ज्यामुळे अनेकदा कानातून घाण बाहेर पडत नाही.
आंघोळ करताना किंवा केस धुताना कानाच्या पाणी किंवा साबणाचा फेस जमा होतो. पाणी गेल्यामुळे आपल्याला नीटसे ऐकू येत नाही कानात इतका मळ साचतो की, यामुळे बरेचदा आपला कान दुखू लागतो. अशावेळी आपण बड किंवा ड्रॉपचा वापरुन कान साफ करतात. परंतु, यापद्धतीने कान साफ करणे धोक्याचे ठरु शकते. कान स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक क्रियेची निवड करायला हवी.
1) कान स्वच्छ कसा कराल
कान स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करताना हलक्या हाताने मऊ कापडाने स्वच्छ करा. तसेच कानात टोकेरी किंवा कॉटन बड घालू नका. यामुळे कानाला हानी पोहोचू शकते.
2) कानातील केस, चिकट द्रवमुळे होते रक्षण
कानाच्या आतील भागात असणारे केस आणि आतील भागात असणारे चिकट द्रव हे कानाच्या संरक्षणाची भूमिका बजावतात. त्यामुळे कानात धुळीचे कण जमा होत नाही.
4) बड नकोच
कानात बडचा वापर करु नका. परंतु, तरीदेखील अनेकजण त्याचा वापर करतात. यामुळे अनेकदा बड कानात किती खोलवर गेले आहे याचा अंदाज येत नाही. यामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे कानाला संसर्ग देखील होऊ शकतो. त्यासाठी बड न वापरण्याचा सल्ला दिला जातो.
5) लहान मुलांची घ्या काळजी
लहान मुलांना अनेकदा सर्दी होते. ज्यामुळे नाकातील सर्दी कानात जाऊन कानातून पाणी वाहू लागते. अशावेळी कोणतेही तेल कानात टाकू नका. त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ओपीडीत ७० टक्के रुग्ण कानाच्या आजाराचे असतात. त्यामध्ये कानात बड घालून संसर्ग झालेले काही रुग्ण असतात. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्यांनी तर कानात बड घालू नये. त्यामुळे त्यांना कानात जखम होऊन मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…
मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…
Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…
नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…