अद्रक रस 1/2 लहान चमचा व 1/2 लहान चमचा मध व 1/2 लहान चमचा आल्याचा हळद एकत्र करून चाटावे. दिवसातून 2 वेळ.
एक लहान चमचा हळद व एक लहान चमचा गाईचे साजूक तुप एकत्र करून मंद उष्णते वर थोडे परतवून घ्यावे व त्यात 1/8 लहान चमचा अद्रक रस व 1/2 लहान चमचा तुलसी रस टाकून एकजीव करून सेवन करावे-असे दिवसातून सकाळ-दुपार व रात्री झोपताना सेवन करावे.
1/2 लहान चमचा हळद, 1/8 लहान चमचा मिरेपूड (चिमूटभर), एक लहान चमचा मध, एक लहान चमचा कोरफड गर एकत्र करून दिवसातून 2 वेळ घेतल्यास कफाचे बेडके येणे बंद होतात.
अर्धा लहान चमचा ओवा, थोडा गूळ व लहान पाव चमचा हळद यांचे मिश्रण जेवणानंतर दुपारी व रात्री घेणे.
3 लवंगची पूड 5 तुळशी पाने, 2 हिरवी विलायचीचे ठेचलेले दाणे, दालचिनी पूड 5 चिमूटभर व थोडा गवती चहा 3 कप पाण्यात मध्यम उष्णतेवर उकळा व पाणी निम्मे झाल्यावर त्यात एक मोठा चमचा खडीसाखर टाकून तयार काढा दिवसातून एक वेळ प्या. (मुळव्याध असल्यास पिऊ नका तसेच उष्ण लघवी होत असल्यास पिऊ नका)
रात्री झोपतांना कोमट पाण्यासोबत 1 मोठा चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावे.
खोकला व कफ असल्यास गाईच्या एक मोठा चमचा साजूक तुपात व 10 काळे मिरे टाकून मंद उष्णतेवर गरम करण्यास ठेवावे व मोहरी सारखे मिरे तडतडल्यावर तूप थंड होऊ द्यावे व 2 लहान चमचे खडीसाखर पूड टाकून दिवसातून दोन वेळा जेवणाच्या अगोदर 3 तास घ्यावे.
अद्रक रस दीड लहान चमचा व अडीच लहान चमचा गुळ एकत्र करून त्याच्या 3 गोळ्या तयार करा व सकाळ – दुपार व सायंकाळ घ्या.
छातीत कफ व खोकला येत असल्यास मुठभर फुटाणे व 3 लसूण पाकळ्या सोबत खा व एक तासभर पाणी पिऊ नका व काही खाऊ नका.
5 चिमूट काळी मिरी पूड व 5 चिमूटभर सुंठ पूड यांचे मिश्रण मधातून दिवसातून 3 वेळ घ्या.
सर्दी-कफ-खोकला असल्यास कोमट पाणी प्या. थंड पाणी बिलकुल पिऊ नका
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…