आरोग्य

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही ना काळजी घ्या…

हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो.

कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात की तुम्ही कॅन किंवा बॉटलमधलं अन्न खाऊ शकता पण रोज रोज हे असं अन्न खाऊ नका यामुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. कारण या वेगळे घटक शरीरात जातात.

प्लास्टीकचा जास्त वापर कॅन्सरचं कारण ठरू शकतो. खासकरून प्लास्टीकच्या पॉलिथिनमध्ये ठेवलेले गरम पादार्थ खाल्ल्यानं किंवा प्यायल्यानं कॅन्सरचा धोका वाढतो. अनेक रिसर्चमधून हे दिसून आले आहे की बिस्फिनॉल ए (बीपीए) नावाचे केमिकल पेशींची संरचना बदलून कॅन्सरचा धोका वाढवतात.

प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या अन्नात फॅट्स जास्त प्रमाणात असते. जे सॅच्युरेडट फॅट असते जे खूपच घाणेरडे मानले जाते. यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल वाढते. जे नसांमध्ये जमा झाल्यामुळे हृदयाचे विकार वाढतात.

डायबिटीस: पॅकेज्ड फूड्स आणि ड्रिंक्समध्ये आर्टिफिशियल स्वीटनरर्स असतात. ज्यात साखर, मीठ वेगानं विरघळतं आणि ब्लड शुगर वाढते. दीर्घकाळ या पदार्थांचे सेवन केल्यानं डायबिटीसचा धोका वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

9 मिनिटे ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

5 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

5 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

5 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

5 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

7 तास ago