आरोग्य

डोळ्या खालील काळी वर्तुळे आणि घरगुती उपाय

आजकाल अनेक लोक डोळ्या खाली काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त आहेत. काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि सुस्त दिसतो. डोळ्या खाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, निर्जलीकरण, निद्रानाश किंवा जास्त ताण असू शकतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही घरगुती वस्तू वापरता येतात. यामध्ये मधाचाही समावेश होतो. मध ही आपल्या स्वयंपाक घरात असलेली एक अशी वस्तू आहे जी आरोग्यासोबतच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करू शकतात. मध त्वचेचा टोन सुधारण्यास देखील मदत करते.

मध आणि लिंबाचा रस: काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी मध आणि लिंबाचा रस मिसळून लावता येते. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड आढळते, जे त्वचेवरील डाग साफ करण्यास मदत करते. एका भांड्यात एक चमचा मध घ्या, त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट डोळ्या भोवती लावा आणि २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.

मध आणि कोरफड: डोळ्या खालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मध आणि कोरफडीचा वापर केला जातो. एका भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा ताजे कोरफडीचे जेल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण १०-१५ मिनिटे डोळ्या खाली लावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ४ वेळा याचा वापर केल्याने लवकरच फरक जाणवेल.

मध आणि टोमॅटोचा रस: डोळ्या भोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मध आणि टोमॅटोचा रस वापरू शकता. टोमॅटोच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी डाग हलके करण्यास मदत करते. एका भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा टोमॅटोचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण डोळ्या खाली लावा आणि १-२ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. १०-१५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

4 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

4 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

4 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

4 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

4 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

4 तास ago