आजकाल अनेक लोक डोळ्या खाली काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त आहेत. काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि सुस्त दिसतो. डोळ्या खाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, निर्जलीकरण, निद्रानाश किंवा जास्त ताण असू शकतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही घरगुती वस्तू वापरता येतात. यामध्ये मधाचाही समावेश होतो. मध ही आपल्या स्वयंपाक घरात असलेली एक अशी वस्तू आहे जी आरोग्यासोबतच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करू शकतात. मध त्वचेचा टोन सुधारण्यास देखील मदत करते.
मध आणि लिंबाचा रस: काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी मध आणि लिंबाचा रस मिसळून लावता येते. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड आढळते, जे त्वचेवरील डाग साफ करण्यास मदत करते. एका भांड्यात एक चमचा मध घ्या, त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. ही पेस्ट डोळ्या भोवती लावा आणि २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. १० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.
मध आणि कोरफड: डोळ्या खालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मध आणि कोरफडीचा वापर केला जातो. एका भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा ताजे कोरफडीचे जेल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण १०-१५ मिनिटे डोळ्या खाली लावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ४ वेळा याचा वापर केल्याने लवकरच फरक जाणवेल.
मध आणि टोमॅटोचा रस: डोळ्या भोवतीची काळी वर्तुळे दूर करण्यासाठी मध आणि टोमॅटोचा रस वापरू शकता. टोमॅटोच्या रसामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी डाग हलके करण्यास मदत करते. एका भांड्यात एक चमचा मध आणि एक चमचा टोमॅटोचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण डोळ्या खाली लावा आणि १-२ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. १०-१५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.
(सोशल मीडियावरून साभार)
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…