आरोग्य

आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर – फरक दिसेल काही दिवसांत…

बाहेरील वातावरण, धूळ, प्रदूषण यांचा थोडाफार परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. या सगळ्यामुळे आपली त्वचा खराब तर होतेच, शिवाय त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपण आपले शरीर आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतो, तसेच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. शरीराचीच काळजी घेण्यासाठी जसे बॉडी डिटॉक्स केले जाते, तसेच त्वचेचे आरोग्य आणि सौंदय टिकवून ठेवण्यासाठी आयुर्वेदानुसार त्वचा वेळच्यावेळी डिटॉक्स करणे गरजेचे असते.

त्वचेला डिटॉक्सिफाय करण्याचे अनेक मार्ग आहेत. जे केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर शरीराला देखील आतून शुद्ध करतात आणि त्वचेची योग्य ती काळजी घेतात.

आयुर्वेदानुसार स्किन डिटॉक्स करण्याची सोपी पद्धत पाहूयात…

१) त्वचेला घाम येणे: शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी त्वचेला घाम येणे खूप गरजेचे असते. सौना किंवा स्टीम बाथमधून घाम गाळल्याने त्वचेच्या आत साचलेली घाण आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात.

जेव्हा आपल्या त्वचेला घाम येतो तेव्हा आपल्या त्वचेवरील छिद्रे उघडतात आणि ही क्रिया त्वचा स्वच्छ करण्यास अधिक मदत करते. घामामुळे रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते. आयुर्वेदानुसार, शरीरातील दोष संतुलित करण्यासाठी घाम येणे खूप फायदेशीर आहे. स्टीम बाथचा नियमित वापर शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला गती देतो. ज्यामुळे त्वचा केवळ निरोगी आणि चमकदार राहतेच, शिवाय आरोग्य देखील सुधारते. जर तुम्ही स्टीम बाथ घेत असाल तर आठवड्यातून २ ते ३ वेळा स्टीम बाथ घेणे फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतील.

2) ड्राय ब्रशिंग: आयुर्वेदात, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेवर ड्राय ब्रशिंग करण्याची पद्धत वापरली जाते. हा एक प्राचीन उपाय आहे जो डेड स्किन काढून टाकण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी केला जातो. ड्राय ब्रशिंगमुळे त्वचेच्या पृष्ठभागावर साचलेली डेड स्किन आणि घाण निघून जाते, ज्यामुळे त्वचा फक्त स्वच्छच होत नाही तर ती उजळ देखील होते. खबरदारी म्हणून, ही प्रक्रिया त्वचेवर हळूवारपणे करावी आणि कापसाचा किंवा सौम्य नैसर्गिक ब्रशचा वापरावा. स्क्रबिंग करताना त्वचेचे घर्षण टाळण्यासाठी, ते हलक्या हातांनी करावे.

३) त्वचेला मालिश करणे: आयुर्वेदात, अभ्यंग म्हणजेच त्वचेला तेलाने मालिश करणे गरजेचे असते. त्वचेला मालिश केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हा एक असा उपाय आहे जो केवळ त्वचेचे पोषण करत नाही तर शरीरातील विविध दोषांचे संतुलन देखील करतो. मालिश केल्यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेची चमक वाढवण्यासोबतच त्वचा मऊ आणि चमकदार होते.

मालिशसाठी नेमके कोणते तेल वापरावे

१) वात दोषासाठी तिळाचे तेल: तिळाचे तेल उष्ण असते, जे वात दोष संतुलित करण्यास मदत करते. हे शरीराला उबदार ठेवते आणि त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवते.

२) पित्त दोषासाठी नारळाचे तेल: नारळाचे तेल थंड असते. जे पित्ताला शांत करते आणि त्वचेला आराम देते. हे त्वचेची जळजळ आणि सूज कमी करण्यास देखील मदत करते.

३) कफ दोषासाठी मोहरीचे तेल: मोहरीचे तेल उष्ण असते, जे कफ दोष कमी करते आणि शरीरात रक्ताभिसरण वाढवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

5 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

5 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

5 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

5 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

5 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

5 तास ago