वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल करतं. असे अनेक लोक जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांन वाटतं की, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं. पण खरंच बटाटे खाऊन वजन वाढतं का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत डॉक्टर सांगतात की, बटाटे खाऊन वजन वाढेल हे काही गरजेचं नाहीये. वजन कमी करण्यासाठी लोक आहारातून बटाटे दूर करतात. बटाटे खाऊन वजन वाढतं असं लोकांना वाटतं की, कारण यात कार्ब्स भरपूर असतं.
बटाटे खाऊन खरंच वजन वाढतं का
ज्या लोकांना वजन वाढवायचं असतं त्यांच्यासाठी बटाटे खाण्याची पद्धत वेगळी असते. वजन वाढण्यामागे तुमचा एकंदर आहार गरजेचा असतो. केवळ बटाटे खाऊन वजन वाढत नाही. बटाटे खाण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. जर तुम्ही बटाटे फ्राय करून लोणी किंवा क्रीमसोबत खात असाल तर तुमचं वजन वाढेल. लोणी आणि क्रीम बटाट्या सोबत मिक्स केल्याने कॅलरीचं प्रमाण वाढतं जे ज्यामुळे फॅट वाढतं. बटाटे खाल्ल्याने शरीराला भरपूर शक्ती मिळते. याने थकवा आणि कमजोरी दूर होते.
पचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही फायबर भरपूर असलेले बटाटे खाऊ शकता किंवा अपचन वा बद्ध कोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही बटाटे खाऊ शकता. बटाटे खाऊन वजन वाढू शकतं, पण हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं, ज्यामुळे ऊर्जा मिळते. पण बटाटे बनवण्याची पद्धत आणि प्रमाण यामुळे वजन वाढू शकतं.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतं. जे शरीरात ग्लूकोजच्या रूपात अवशोषित होतं आणि वजन वाढू शकतं. बटाटे तळून खाल्ल्याने वजन वाढू शकतं. कारण यात अतिरिक्त कॅलरी अधिक असतात. मात्र, बटाट्या मधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरासाठी आवश्यक असतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…