आरोग्य

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं जातं की, पाणी प्यायल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तर कधी सांगितलं जातं की, च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात.

त्वचेसंबंधी काही गैरसमज 

एक्नेसाठी पाणी 

पाणी प्यायल्याने त्वचेवरील एक्ने दूर होत नाहीत. पाणी प्यायल्याने त्वचेचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं, पण याचा काही वैज्ञानिक पुरावा नाही की, पाणी प्यायल्याने एक्नेची समस्या दूर होते. एक्ने हार्मोनमध्ये बदल, बॅक्टेरिया, एक्सेस ऑईलचं प्रोडक्शन आणि क्लोग्ड पोर्समुळे होतात. हाइयड्रेटेड राहणं एकंदर पूर्ण त्वचेसाठी फायदेशीर असतं. याने त्वचेमध्ये ओलावा राहतो. पण एक्ने दूर करण्यासाठी हा काही ठोस उपाय नाही.

स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या

हात-पाय किंवा शरीराच्या एखाद्या भागात अनावश्यक केस वाढतात तेव्हा स्ट्रॉबेरी स्कीन ची समस्या होते. स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या तेव्हा होते जेव्हा त्वचेवर बारीक बारीक पुरळ दिसू लागते. आणि त्वचा रखरखीत होते. इनग्रोन हेअर म्हणजे अनावश्यक केस येण्याच्या समस्येचं मुख्य कारण हात-पायांवर शेव्हिंग करणं आहे. अशात स्ट्रॉबेरी स्कीनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी असं सांगितलं जातं की, स्क्रब केल्याने त्वचा पूर्णपणे साफ होते. पण डॉक्टर सरीन सांगतात की, स्क्रब केल्यावर ही समस्या दूर होत नाही.

चेहरा बारीक करण्यासाठी च्युइंगम

बरेच लोक असा विचार करतात की, च्युइंगम खाल्ल्याने सुजलेला चेहरा बारीक होतो. मात्र, डर्मेटोलॉजिस्टनुसार फेशिअल मसल्सच्या एक्सरसाईजने चेहऱ्यावर दिसणारं फॅट कमी होत नाही. च्युइंगम चघळल्याने चेहरा बारीक होत नाही, उलट आणि जास्त रूंद दिसू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

7 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

14 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

14 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

14 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

14 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

14 तास ago