आरोग्य

तुम्हालाही सतत चमचमीत तिखट खायला आवडते? मात्र अती तिखट तुमच्या ‘असं’ जीवावर बेतू शकत

काही जणांना थोडेही तिखट सहन होत नाही. त्यांच्या डोळ्यातून लगेच पाणी यायला लागते. नाक, कान लगेच लाल होतात. साधी मिरचीही काहींना चरचरते तर काही जण बिनधास्त कच्च्या मिरच्या चाऊन खातात. कितीही तिखट खाण्याची सवय काहींना असते. त्यांना तिखट सोसते.

हा-हू असे काहीही आवाज न करता ते मस्त लाल भडक पदार्थ ही खातात. आपण भरपूर तिखट खातो या गोष्टीचा अनेकांना अभिमान वाटतो. मात्र असे अति तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अनेक प्रकारचे शारीरिक त्रास तिखट खाल्याने होऊ शकतात. हेल्थशॉट्स तसेच क्लेवरलँण्ड क्लिनिक हेल्थसारख्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या मजकूरानुसार, अति मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्याने पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. विविध आजार उद्धवू शकतात.

१) अति तिखट खाल्याने पोटातील आम्ल वाढते. त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास सुरू होतो. एकदा का आम्लाचा त्रास सुरू झाला की मग सारख्या उलट्या होतात. पोटात दुखायला लागते. तसेच छातीत जळजळ सुरू होते. सारखे हे त्रास सहन करावे लागतात. पचन व्यवस्थित होत नाही. पचन न झाल्याने मळमळायला लागते. मग उलट्या डोकेदुखी असे त्रासही होतात.

2) तिखट खाल्याने जि‍भेच्या सहनशीलतेवर परिणाम होतो. जि‍भेवर फोड येतात. सतत तोंड येते. मग तिखट काय सगळेच पदार्थ खाताना फोड झोंबतात. अति तिखट खाल्याने जिभेची कार्यक्षमताही कमी होते.

३) तिखट खाताना डोळ्यातून पाणी येते. तसेच भरपूर घाम फुटतो. शरीराची ती प्रतिक्रिया असते. शरीर तिखट पचवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे घाम येतो. त्वचा लाल होते. तिखट खाल्याने चेहर्‍यावर पुरळ उठते. कारण तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.

४) अति तिखट खाल्याने हृदयावरही परिणाम होऊ शकतो. तसेच गॅस्ट्रीक अल्सर होऊ शकतो. असे आजार फार महागात पडतात.

५) पाईल्स बद्दल तर सर्वांना माहिती आहे. अति तिखट खाल्याने पाईल्सचा त्रास होऊ शकतो. पाईल्स एकदा झाले की मग बसण्या-झोपण्याचेही वांदे होतात. तसेच हा आजार लगेच बरा होत नाही. फार त्रासदायक ठरतो.

६) आतड्यांना तिखटामुळे त्रास होतो. आतड्यांसाठी अति तिखट खाणे धोकादायक ठरु शकते. विविध विकार उद्धवतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा. प्रत्येक चव योग्य प्रमाणातच खावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

1 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

1 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

2 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

3 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

4 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

4 तास ago