आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.
अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू फिरताना दिसतात. हे जीवाणू जिवंत स्थितीत आपल्या शरीरात गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्यातील एन्झाइमची प्रक्रिया सुरळीत चालते. या जीवाणूंसाठी आपण दही खातो. आयुर्वेदाच्या भाषेत दही हे बॅक्टेरियाचे घर मानले जाते, एका कप दह्यामध्ये तुम्हाला करोडो बॅक्टेरिया दिसतील.
दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर घातल्यास एका मिनिटात सर्व बॅक्टेरिया मरतात आणि त्यांचे मृतदेह आपल्या शरीरात जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर टाकल्यास दह्यातील सर्व जीवाणूजन्य गुणधर्म नष्ट होतात कारण मिठात असलेले रसायन हे जीवाणूंचे शत्रू असतात. आयुर्वेदात असे सांगितले आहे की दह्यामध्ये अशा गोष्टी घालाव्यात, ज्यामुळे त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही गुळासोबत खा, गूळ घातल्याबरोबर बॅक्टेरियाची संख्येत वाढ होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
(सोशल मीडियावरून साभार)
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…