दहीमध्ये मीठ किंवा साखर टाकले तर ते विष बनते का

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना मीठ किंवा साखर घालून दही खाण्याची सवय असते. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की ही सवय धोकादायक आहे कारण मीठ किंवा साखर घातल्याने दही विष बनते, या दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

अलीकडे एकच चर्चा रंगली आहे की दही खायचे असेल तर नेहमी गूळासोबतच खावे. जेव्हा मायक्रोस्कोपच्या साहाय्याने दही पाहिल्यावर त्यात असंख्य जीवाणू फिरताना दिसतात. हे जीवाणू जिवंत स्थितीत आपल्या शरीरात गेले पाहिजेत, कारण जेव्हा आपण दही खातो तेव्हा आपल्यातील एन्झाइमची प्रक्रिया सुरळीत चालते. या जीवाणूंसाठी आपण दही खातो. आयुर्वेदाच्या भाषेत दही हे बॅक्टेरियाचे घर मानले जाते, एका कप दह्यामध्ये तुम्हाला करोडो बॅक्टेरिया दिसतील.

दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर घातल्यास एका मिनिटात सर्व बॅक्टेरिया मरतात आणि त्यांचे मृतदेह आपल्या शरीरात जातात ज्याचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही. दह्यामध्ये चिमूटभर मीठ किंवा साखर टाकल्यास दह्यातील सर्व जीवाणूजन्य गुणधर्म नष्ट होतात कारण मिठात असलेले रसायन हे जीवाणूंचे शत्रू असतात. आयुर्वेदात असे सांगितले आहे की दह्यामध्ये अशा गोष्टी घालाव्यात, ज्यामुळे त्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते. दही गुळासोबत खा, गूळ घातल्याबरोबर बॅक्टेरियाची संख्येत वाढ होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)