अनेकदा सर्दीशिवाय देखील धुळीमुळे किंवा कोणत्यातरी वासामुळे शिंक येते. शिंक येण्याआधी आपल्याला तसे संकेत मिळतात. म्हणजे नाकात विचित्र गुदगुल्या जाणवतात. किंवा काहीतरी हालचाल जावते सिग्नलनंतर मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शिंक येते. पण तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की. शिंक येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीर थरथरते. तसेच डोक आतून हालल्यासारखं वाटतं. तसेच त्या शिंकेची कळ कुठेतरी हृदयापर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून त्यावेळी असंही जाणवतं की, हृदयाने तेवढा सेकंद ब्रेक घेतला की काय
शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात
असं खरंच म्हटलं जातं की शिंक येणे ही एक सामान्य घटना असली तरी, अनेक लोकांचा असा विश्वास आहे की शिंकताना तेवढ्या सेकंदापुरते हृदयाचे ठोके थांबतात. खरंच असं होतं का.
हे जाणून आश्चर्य वाटेल
शिंकताना हृदय थांबते असे अनेकदा म्हटले जाते. परंतु हे जाणून आश्चर्य वाटेल की यात काहीही तथ्य नाही. हे खरे आहे की शिंकताना हृदय थांबत नाही. पण जेव्हा तुम्हाला शिंकण्यापूर्वी श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा असे वाटते की तुमचा श्वास मंदावला आहे आणि तुमचे हृदय थांबले आहे की काय. त्यामुळे लगेच लोक देवाचे नाव घेतात.
शिंक आल्यावर नक्की काय घडते
शिंकण्यापूर्वी तुम्ही श्वास घेता तेव्हा तुमच्या छातीवर थोडा दाब पडतो आणि शिंकताना जोराने श्वास सोडला जातो. तेव्हा छातीवरील तो दाब थोडा कमी होतो. या दाबामुळे रक्तप्रवाहात बदल होतात. तसेच कधीकधी जोरात शिंकल्याने छातीत हलकी चमकही येते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडतात की काय असं वाटतं. पण तसे होत नाही.
हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात पण…
हा हृदयाचे ठोके थोड्या-बहुत प्रकारे प्रभावित होऊ शकतात. पण शिंकताना हृदय धडधडणे थांबते हे पूर्णपणे खरे नाही. शिंकताना हृदयातील क्रिया अखंडपणे सुरूच असते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…