आरोग्य

थकवा नाही तर ‘या’ आजाराचे आहे लक्षण, वेळीच करा उपचार

कधी कधी आपण रात्री वेळेवर झोपतो, पुरेशी झोप घेतो, तरी सकाळी उठल्यावर अंग थकल्यासारखं वाटतं, डोळे मिटतच राहतात आणि दिवसभर पेंग येते. अनेकांना वाटतं ही आळशीपणाची किंवा थकव्याची लक्षणं आहेत. पण प्रत्यक्षात ही शरीरातील किंवा जीवनशैलीतील काही असंतुलनाची लक्षणे असतात. झोप हे फक्त विश्रांतीचं साधन नसून शरीरातील ऊर्जा पूर्ववत करण्याची प्रक्रिया आहे. जर ती व्यवस्थित झाली नाही, तर झोपूनही थकवा जाणवतो.

झोप जरी झाली तरी ती गाढ नसेल तर मेंदू आणि शरीराला खरी विश्रांती मिळत नाही. रात्री मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरणं झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करतं. या उपकरणांतून येणारा निळा प्रकाश (blue light) मेंदूला जागं ठेवतो, त्यामुळे झोप नीट होत नाही आणि सकाळी उठल्यावर सुस्ती येते.

ताणतणाव आणि मानसिक थकवा हे दुसरं मोठं कारण आहे. सतत चिंता, विचारांचा घोळ किंवा कामाचा दबाव यामुळे मेंदू विश्रांती घेत नाही. रात्री शरीर झोपतं पण मेंदू जागा राहतो. परिणामी, झोप पूर्ण झाली असं वाटतं पण सकाळी ताजेपणा जाणवत नाही. अयोग्य आहार देखील पेंग वाढवतो. जड, तेलकट, गोड किंवा अतितिखट अन्न सेवन केल्यास पचनास वेळ लागतो, ज्यामुळे झोपेची गती बिघडते. पाणी कमी पिण मेंदूतील रक्तप्रवाहावर परिणाम करतं, त्यामुळे डोकं जड आणि अंग सुस्त वाटतं. स्लिपअॅप्निया, थायरॉईड, ब्लड शुगर, डिप्रेशन यामुळेही पेंग येते.

सर्वप्रथम झोपेची दिनचर्या ठरवा. दररोज ठराविक वेळी झोपणं आणि उठणं याची सवय लावा. झोपण्याच्या एक तास आधी मोबाइल, टीव्ही किंवा तेज प्रकाश असलेली उपकरणं दूर ठेवा. शांत, अंधाराचं आणि थंड वातावरण झोपेसाठी सर्वोत्तम असतं. आहारात संतुलन ठेवा. रात्री पचायला हलकं अन्न घ्या. सूप, खिचडी किंवा दूध यासारखे पदार्थ झोपेसाठी फायदेशीर असतात. दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि तिखट, किंवा गोड अन्न कमी करा.

दररोज थोडा व्यायाम करा. चालणे, योगासनं, प्राणायाम किंवा हलकं स्ट्रेचिंग यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढतं, ऊर्जा मिळते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. ताण कमी करण्यासाठी ध्यान, वाचन किंवा संगीत ऐकणं उपयोगी ठरतं. झोपण्याआधी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. वरील उपाय केल्यानंतरही पेंग येत राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तातील लोह, थायरॉइड आणि जीवनसत्तव बी१२ची तपासणी करुन योग्य उपचार घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

6 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

14 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

15 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

16 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

21 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

21 तास ago