आरोग्य

फोडणीतला कडीपत्ता फेकून देऊ नका, चावून खा बघा फायदे

आपल्या रोजच्या स्वयंपाकात हिरव्यागार कडीपत्त्याचा वापर आपण करतोच. कोणत्याही भाजी, आमटी, डाळीला फोडणी द्यायची म्हटलं की कडीपत्ता हवाच. कडीपत्त्याची पाने फक्त पदार्थांच्या चवीत भरच घालत नाहीत तर, आरोग्याच्या दृष्टीने औषधी आणि बहुगुणी देखील आहेत. खरंतर, आपल्यापैकी बरेचजण पदार्थांतील कडीपत्ता बाजूला काढून टाकतात. परंतु कडीपत्ता बाजूला काढून ठेवण्यापेक्षा तो दररोज खाणे अधिक फायदेशीर ठरते

कडीपत्त्यामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सारखे अनेक पोषक घटक असतात, जे शरीराला आतून डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात. कडीपत्ता फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयुक्त नाही तर केस गळणे, पचन समस्या आणि मधुमेह यासारख्या आजारांमध्ये देखील उपयोगी ठरतो. याशिवाय, त्वचेला चमकदारपणा आणण्यासाठी आणि शरीरात उर्जेची भर घालण्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठीच, अशी बहुगुणी कडीपत्त्याची पाने दररोज सकाळी रिकाम्या पोटी चावून खाण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता चावून खाण्याचे फायदे

१) पचनसंस्था मजबूत होते: कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. कडीपत्त्याच्या पानांत असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. याचबरोबर, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्यांपासून आराम देतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत करणारे एंजाइम अ‍ॅक्टिव्ह होतात. यामुळे तुम्हाला योग्य वेळी भूक लागते आणि तुमचे पोट हलके राहते. जर तुम्हाला वारंवार पोटदुखी किंवा गॅसची समस्या होत असेल तर तुमच्या रोजच्या डाएटमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा समावेश करणे गरजेचे आहे.

२) वजन कमी करण्यास फायदेशीर: वेटलॉस करणाऱ्यांसाठी कडीपत्ता हा एक स्वस्त आणि मस्त असा उत्तम पर्याय आहे. सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो. इतकेच नाही तर चरबी जाळण्याची प्रक्रिया सुधारते. कडीपत्त्यामध्ये असलेले फायबर पोट बराच काळ भरलेले ठेवते, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. याशिवाय, ते शरीरातील विषारी घटक काढून टाकते, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सोपी होते. कडीपत्ता रोज खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते.

३) केसांना जाड व मजबूत करण्यासाठी: जर केस वारंवार गळत असतील, पांढरे होत असतील किंवा कमकुवत झाले असतील तर कडीपत्त्याची पाने चावून खाणे अधिक फायदेशीर ठरु शकते. कडीपत्त्याच्या पानांत असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रथिने केसांच्या मुळांना पोषण देतात. सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि अकाली पांढरे होणे देखील थांबते. याशिवाय, स्काल्पची स्वच्छता देखील केली जाते ज्यामुळे कोंडा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या दूर होतात व हळूहळू केसांना नैसर्गिक चमक येऊ लागते.

४) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास: मधुमेह असलेल्या लोकांसाठी कडीपत्ता खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेले फायबर आणि मधुमेहविरोधी गुणधर्म शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. रिकाम्या पोटी कडीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी हळूहळू नियंत्रणात येते.

५) त्वचेला नैसर्गिक चमक येते: कडीपत्ता खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारतो आणि मुरुमांची समस्या देखील कमी होते. त्यातील अँटिऑक्सिडंट घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच, ते रक्त शुद्ध करते आणि ऍलर्जी किंवा खाज सुटणे यासारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम देते. दररोज रिकाम्या पोटी कडीपत्ता चावल्याने त्वचा हळूहळू निरोगी आणि चमकदार दिसू लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

9 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

11 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

16 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

16 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

16 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

16 तास ago