आरोग्य

फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते.

ब्लोटिंग आणि गॅस दूर करणारा उपाय

५ दिवस लागोपाठ एक खास पाणी बनवून प्याल तर पोटाचे छोटे-मोठे विकार लगेच दूर होऊ शकतात. हे मिश्रण प्यायल्यास पोटात वेदना, क्रॅम्प्स, ब्लोटिंग, डायरिया, बद्धकोष्ठता, जेवणानंतर वाटणारी अस्वस्थता दूर होऊ शकते. हे पाणी बनवण्यासाठी २ लिंबाच्या रसात अर्धा चमचा काळी मिरी आणि काळं मीठ टाका. आता यात दोन मोठे चमचे गरम पाणी टाका. हे मिश्रण तुम्ही ५ दिवस दुपाच्या जेवणाआधी प्यावं.

इतरही काही उपाय

ओव्याचं पाणी प्यायल्याने सुद्धा ब्लोटिंग आणि गॅसची समस्या कमी होते. तसेच पोटाला आरामही मिळतो.

आल्याचा चहा सुद्धा पोटासाठी खूप फायदेशीर असतो. यातील अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण पोटाच्या समस्या दूर करतात.

बडीशेप सुद्धा पोटासाठी खूप जास्त फायदेशीर असते. बडीशेपचं पाणी पिऊ शकता किंवा थेट खाऊ शकता.

कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्याल तरीही पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

19 तास ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

20 तास ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

20 तास ago

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २…

20 तास ago

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…

20 तास ago

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…

20 तास ago