आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ही समस्या असते. पोट जर साफ झालं नाही तर पोटात दुखणं, पोट फुगणं, अॅसिडिटी अशा समस्या होतात. अशात पोट साफ होण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
१) लिंबू आणि मध: लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तेच मध बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोटाला आराम देतं. एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाका. हे पाणी रात्री झोपण्याआधी प्या. यानं पचन तंत्र अॅक्टिव राहतं.
२) जिरे पावडर: जिऱ्याचा वापर वेगवेगळ्या उपचारांमध्ये केला जातो. जिऱ्यानं पोटातील सूज आणि गॅस कमी करण्यास मदत मिळते. तसेच जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते. अर्धा चमचा जिरे पावडर एक ग्लास कोमट पाण्यात रात्री झोपण्याआधी प्या. सकाळी पोट लगेच साफ होईल.
३) त्रिफळा चूर्ण: आयुर्वेदात त्रिफळा चुर्णाला पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय मानलं आहे. या चुर्णानं आतड्या हेल्दी राहतात. एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास सकाळी पोट सहज साफ होईल.
४) अॅपल व्हिनेगर: अॅपल सायडर व्हिनेगरनं आतड्यांची सफाई होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्या.
(सोशल मीडियावरून साभार)
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…